शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण, नातेवाईकांना मोफत जेवण

By admin | Updated: May 12, 2014 00:40 IST

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात. एका रुग्णासोबत किमान दोन ते तीन नातेवाईक असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची बरीच हेळसांड होते. मागील दोन वर्षांपासून दररोज दोन वेळचे तीनशे ते चारशे रुग्णांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम आॅल इंडिया मजलीस तामीर-ए-मिल्लततर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही हातभार लावावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यांतून अनेक रुग्ण येतात. रुग्ण बरा होईपर्यंत नातेवाईकांनाही सोबत राहावे लागते. ज्यांचे नातेवाईक औरंगाबादेत राहतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. ज्यांचे शहरात कोणीच नाही, त्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांकडे हॉटेलमध्ये जेवण करण्याएवढे पैसेही नसतात. कोणासमोर हात पसरणेही त्यांना योग्य वाटत नाही. त्यापेक्षा चहा, बिस्किटांवर अनेक जण दिवस काढत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन तामीर-ए-मिल्लत या संस्थेच्या तरुणांनी ऐतिहासिक पाणचक्कीजवळ दोन वेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला. मशीद जमील बेग परिसरात दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी ७ ते ८ यावेळेत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण दिल्या जाते. नातेवाईकांनी पोटभर घरच्यासारखे जेवण करावे हा प्रयत्न मिल्लतच्या तरुणाईचा असतो. सकाळी आणि सायंकाळी मिळून सुमारे चारशे नागरिक येथे जेवण करतात. ज्या रुग्णांसोबत महिला नातेवाईक आहेत, त्यांना पार्सलद्वारे जेवण देण्याची पद्धत आहे. मागील दोन वर्षांमध्ये मिल्लतच्या तरुणांनी एक दिवसही या उपक्रमात खंड पडू दिला नाही. दररोज चारशे जणांना पोटभर जेवण देणे सोपे नाही. मोठी कसरत करीत ते नागरिकांना जेवण उपलब्ध करून देतात. रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देताना कोणताही भेदभाव आमच्याकडे नाही. माणुसकीच्या नात्याने हा उपक्रम सुरू असल्याचे या संस्थेचे सचिव अब्दुल मोईद हशर यांनी नमूद केले. दानशूर मंडळींचे सहकार्य गरजू व्यक्तींना पोटभर जेवण देण्याच्या या उपक्रमाचे अनेक जणांनी प्रशंसा केली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही दानशूर मंडळी दाळ, धान्य, तांदूळ, तेल, मसाले, भाजीपाला आणून देतात. शिवाय काही नागरिक आर्थिक मदतही करीत असतात. नागरिकांच्या सहकार्यावरच हा उपक्रम सुरू असल्याचे मिल्लतच्या तरुणांचे म्हणणे आहे.