शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जातून सुटला, सावकारीत अडकला

By admin | Updated: June 24, 2017 23:49 IST

नांदेड: आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे़

शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे़ या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़ परंतु दुसरीकडे हाच शेतकरी मात्र वर्षानुवर्षे सावकारीच्या जाळ्यात अडकला आहे़ दरवर्षी सावकारीची प्रकरणे वाढतच जात असून सध्या उपनिबंधक कार्यालयाकडे अशा १५ प्रकरणांची सुनावणी सुरु आहे़ सावकारी वर्षानुवर्षे चालत आली आहे़ काळाच्या ओघात बारा बलुतेदारी पद्धत नामशेष झाली आहे़ मात्र सावकारीची भरभराटच होत आहे़ धनदांडग्यांच्या उपजीविकेचे आणि अधिकचे उत्पन्न कमाविण्याचे सावकारी हे प्रमुख साधन बनले आहे़ त्यामुळे अडल्या-नडल्यांना वेळेवर मदत मिळत असली तरी, सावकारांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे़ त्यानंतर शासनाने अधिकृत सावकारी अन् अनधिकृत सावकारी अशी विभागणी केली़ बँकेत कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसाठी खेटे मारण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी गावातीलच सावकारांचे उंबरठे ओलांडल्याचे चित्र आजही पहावयास मिळते़ त्यामुळे बँकांतील कर्जाची माफी झाली असली तरी, प्रत्यक्षात सावकारांच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे़ उपनिबंधक कार्यालयाकडून सावकारांना अधिकृत परवानेही दिले़ आहेत. आजघडीला जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या २४२ एवढी आहे़ दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते़ त्यांच्याबाबत तक्रारी आल्या अन् त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जात नाही़ शेती आणि बिगरशेती कर्जासाठी व्याजाचे दर निश्चित केले असताना अनेक सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जाते़ अशा जिल्ह्यात मार्चपर्यंत उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १५ तक्रारी आल्या आहेत़ त्यांची सध्या सुनावणी सुरु आहे़ या सुनावणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ गतवर्षी अशा एकूण ५६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्यामध्ये आतापर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही, हे विशेष! तर ग्रामीण भागातील अनेक प्रकरणे समोरच येत नाहीत, हेही तितकेच वास्तव आहे़ त्यामुळे सावकारीचा पाश दिवसेंदिवस आणखी घट्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.