शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन तक्रारीत जिल्हाधिकारी कार्यालय टॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:04 IST

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या.

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या. प्रशासन नावाचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उरला नसल्यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा मिळणे अवघड झाल्याचा हा पुरावा आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ८२३ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ४०० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात होत्या. सरकार दरबारी केलेल्या तक्रारींची वेळेत दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. लालफितीचे चटके सहन करून थकलेल्या सामान्य नागरिकाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांची आर्थिककुवत जेमतेम आहे. त्यांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. हे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी लोकांनी केलेल्या तक्रारींची थेट सरकार दरबारी दखल घेण्यासाठी शासनाने सुरूकेलेले ‘आपले सरकार’ हे आॅनलाईन पोर्टल लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांबाबतीत तक्रारींचा वर्षाव सुरू झाला आहे. राज्य शासनाने १५ आॅगस्ट २०१५ पासून हे पोर्टल सुरू केले. त्यावर आतापर्यंत जिल्ह्यातून विविध खात्यांच्या संदर्भातील ७६३ लोकांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ६४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात ३१३ तक्रारी आल्या. त्यातील २६१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. आॅनलाईन तक्रार नोंदविता येते. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असलेल्या तक्रारी प्रथम निवासी उपजिल्हाधिकारी हाताळतात.‘आपले सरकार’च्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे देण्याचीही सोय आहे. नागरिक इंटरनेटवरून अर्ज करू शकतात. लोकांनी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले आहे.