शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आता मुलींना थेट सहामाही बसपास

By admin | Updated: June 25, 2017 23:40 IST

हिंगोली : यावर्षीपासून आता मुलींना थेट सहामाही पास वाटप केल्या जाणार आहेत.

आता मुलींना थेट सहामाही बसपासलोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी पाचवी ते दहावीतील मुलींना अहिल्याबाई होळकर तर आठवी ते बारावी मानव विकास योजनेच्या मोफत प्रवासासाठी बसपास दिल्या जातात. यावर्षीपासून आता मुलींना थेट सहामाही पास वाटप केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासासाठी शासनाकडून दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पासेस वाटप केल्या जातात. गतवर्षी हिंगोली आगारातर्फे ३ हजार ६०० मुलींना योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे. संबंधित शाळेद्वारे आगारप्रमुख यांच्याकडे अर्ज करावे लागतात. त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाते. मोफत प्रवास योजनेचा लाभासाठी विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. शिवाय गावात शाळा उपलब्ध नसल्याचे मुख्याध्यापकाचे तसे प्रमाणपत्र आगार व्यवस्थापकाकडे सादर करावे लागते. सदर संपूर्ण माहिती शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर आगारप्रमुख संबंधित विद्यार्थिनींना प्रवासासाठी मोफत पास उपलब्ध करून देतात. जास्तीत जास्त मुलींनी सदर योजनेच्या लाभ मिळावा यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आगाराकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.