शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

नव्वद टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडून ठेंगा

By admin | Updated: November 10, 2014 23:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या


उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या. याची दखल घेत कृषी खात्याने २ हजार १९२ शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा केल्यानंतर बहुतांश ठिकाणी बियाणात दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. यात केवळ २०५ शेतकऱ्यांना मदत मिळाली तर १ हजार ९८७ शेतकऱ्यांना कंपन्यानी बियाणे बदलून दिले नाहीत हे विशेष.
जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. नगदी पीक म्हणून सोयाबिन या पिकाकडे पाहिले जाते. यंदाच्या हंगामात उशिराने पावसाने आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला होता. यातच त्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणेही न उगवल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. याबाबत कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने तक्रार निवारण समितीकडून क्षेत्रीय पाहणी करुन न उगवलेल्या बियाणांचा पंचनामा करण्यात आला. या पाहणीवेळी बहुतांश ठिकाणी बियाणातच दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यास नकार दिल्याने कृषी खात्याकडून त्यांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील ६८१ गावातून २ हजार १९२ शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, कृषी खात्याने दिलेल्या आदेशानुसार यातील केवळ १९५ शेतकऱ्यांना संबधित कंपन्यांनी बियाणे बदलून किंवा पैसे दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे अजूनही १ हजार ९८७ शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)