शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांत राबविणार राष्ट्रीय पेयजल योजना

By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९७१ गावे आहेत. मात्र अनेक ठिकाणी आजही कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही. किंवा काही ठिकाणी कालबाह्य झालेल्या योजना आहेत. त्यामुळे तेथे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते. मात्र केंद्र सरकारच्या सुरूवातीची भारत निर्माण तर आता राष्ट्रीय पेयजल या नावाने राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे अनेक गावांमधील पिण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यास हातभार लागलेला आहे. या योजनेअंतर्गत २५५ गावांमध्ये कामे राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १४१ कोटी २७ लाख ५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८४ कामे यावर्षी राबविण्यात येणार असून त्यासाठी ३३.७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये २६ योजनांची कामे सुरू झाली होती. त्यापैकी एक काम पूर्ण असून अन्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या कामांमध्ये अंबड तालुक्यात ११, घनसावंगी ५, जालना २२, बदनापूर ७, परतूर ६, जाफराबाद ८, भोकरदन १४ तर मंठा तालुक्यात ११ कामांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी) टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार उद्दिष्ट गतवर्षी भीषण दुष्काळाच्या काळात या योजनेअंतर्गत ८३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या होत्या. यंदा टप्प्याटप्प्याने मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम म्हणाले की, गेल्यावर्षी दुष्काळाच्या काळात टंचाई निवारणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असताना जिल्ह्यात पेयजल योजनेची ८३ कामे झाली. हे सांघिक प्रयत्नांमुळेच होऊ शकले. यावर्षीही दिलेले उद्दिष्ट पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.