शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लोडशेडिंग अटळ

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत. वीज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने शहरात पुन्हा लोडशेडिंग लागू करण्याची तयारी चालविली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून सध्या तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. परिस्थितीत फारसा बदल न झाल्यास दोन महिन्यांतच लोडशेडिंग लागू करावी लागेल, असे खुद्द महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये यंत्रणेतील दोषामुळे होणारी हानी आणि वीज चोरी या दोन्हीचा समावेश आहे. चोरी थांबवून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने महिनाभरापूर्वी दहा भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी शहरातील विविध भागांत सुमारे १६० जणांवर दंडात्मक कारवाई केली; परंतु त्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. सद्य:स्थितीत शहरातील ८४ पैकी केवळ ८ फिडरवरच वीज चोरी नाही. उर्वरित सर्व ७६ फिडरवर वीज चोरी होत आहे. महावितरण कंपनीच्या धोरणानुसार वीज चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग लागू केले जाते. त्यानुसार आता परिमंडळ कार्यालयाने औरंगाबाद शहरातही लोडशेडिंग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तसा प्रस्तावच या कार्यालयाकडून बनविला जात आहे. याविषयी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, शहरात वीज चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे. शिवाय हे प्रमाण जवळपास सर्वच फिडरवर आहे. महिनाभरात आम्ही पथकांमार्फत दीडशेहून अधिक कारवाया केल्या. तरीही वीज चोरी कमी झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही लोडशेडिंगचा विचार करीत आहोत. तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे. वीज चोरी कमी करण्याचा प्रयत्न सध्याही सुरूच आहे. त्याला आणखी गतिमान केले जाईल; परंतु दोन महिन्यांत परिस्थिती बदलली नाही तर लोडशेडिंगची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. महावितरण कंपनीने सहा वर्षांपूर्वी राज्यातील महसुली मुख्यालयाची शहरे भारनियमनमुक्त घोषित केली. तेव्हापासून औरंगाबाद शहरात लोडशेडिंग बंद झाले आहे. ४काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या आत होते. मात्र, आता हे प्रमाण ४५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता भारनियमनमुक्तीपासून पुन्हा एकदा भारनियमन सक्तीचा प्रवास सुरू झाला आहे. महावितरण कंपनीने महिनाभरात शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविली. यामध्ये वीज चोऱ्या तर पकडण्यात आल्याच; परंतु त्यासोबतच आतापर्यंत बिलच आकारले जात नसलेले काही ग्राहकही आढळून आले.