शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र टिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:43 IST

सर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला

औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. यासाठी महापालिका प्रशासन पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली.
अलीकडेच शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जय भवानीनगर, नूर कॉलनीसह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत औरंगाबाद महापालिकेची प्रमुख म्हणून निवड केली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे.
बारवाल यांनी शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काय करता येईल, यासाठी सोमवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपयुक्त रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजय चौधरी उपस्थित होते. पोलीस विभागातील अपुºया मनुष्यबळावर मात करण्यासाठी आयुक्त यशस्वी यादव यांनी नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील नागरिकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन टीम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आपत्ती निवारण दिवस
१३ आॅक्टोबर हा आपत्ती व्यवस्थापन धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार ९ ते १३ आॅक्टोबरदरम्यान आपत्तीविषयक रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात येईल. महापालिका, खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय यावेळी झाला.