शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कुटुंबियांना मिळाली घरांची मालकी

By admin | Updated: July 29, 2014 01:09 IST

मारूती कदम, उमरगा मागील पंचेवीस वर्षापासून घराच्या मालकी हक्कासाठी झगडत असलेल्या येथील इंदिरा गांधी झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या १५२ कुटुंबियांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे

मारूती कदम, उमरगामागील पंचेवीस वर्षापासून घराच्या मालकी हक्कासाठी झगडत असलेल्या येथील इंदिरा गांधी झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या १५२ कुटुंबियांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अखेर मालकी हक्काची घरे मिळाली.येथील श्रमजिवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या समोरील बाजूस राष्ट्रीय महामार्गालगत काळ्या हनुमान शेजारी शासनाच्या वतीने १९८२-८३ साली इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत विविध जाती धर्मातील बेघरांना दोन एकर जागेच्या परिसरात २० बाय १५ फुटाच्या जागेत पाच पत्र्यांची झोपडपट्टी वजा घरे बांधून देण्यात आली होती. त्याकाळी बांधण्यात आलेल्या घरांना शासनाच्या वतीने मागील २५ वर्षापासून मालकी हक्क देण्यात आला नव्हता. घरांचा मालकी हक्क मिळत नसल्याने घरांची डागडूजी करणे या घरात वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांसमोर मोठा प्रश्न होता.मालकी हक्क मिळत नसल्याने घरांची डागडुजीअभावी दुरवस्था झाली होती. अर्धी अधिक घरे खिळखिळा होवून पडली होती. घरासभोवतालच्या रस्त्यांची दुरवस्था होवून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या झोपडपट्टी भागात नागरी सुविधांचा अभाव निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्याची कसलीही सुविधा उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एकमेव हातपंपावर संपूर्ण झोपडपट्टीवासियांना आपली तहान भागवावी लागत असे. डागडुजीविना खिळखिळ्या झालेल्या घरातच वास्तव्यास राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली होती. याबाबत ‘लोकमत’ने २० जानेवारी २०१४ रोजी ‘हक्काचे घर मिळाले, मालकी अधांतरीच’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याशिवाय येथील काशीनाथ राठोड, अशोक कांबळे, अमोल जाधव, सुमन कांबळे, काशीबाई सूर्यवंशी, उमेश गुरव, छोटूमाबी शेख, प्रदीप मोरे आदींसह लाभार्थ्यांचाही घराच्या मालकी हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरुच होता.अखेर प्रशासनाने याची दखल घेत या कुटुंबांना मालकी हक्क देण्याचा निर्णय घेत रविवारी रविवारी खा. रवींद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, नगराध्यक्ष केवळबाई औरादे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. पंचवीस वर्षानंतर मालकी हक्काची लढाई जिंकल्याने हनुमान नगरवासियांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.मुख्याधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाचीया कामी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष ढेंगळे यांना याप्रकरणी विचारपूस केली होती. शासकीय जागेत उभारण्यात आलेल्या घराचे मालकी हक्क शासनाच्या वतीने देण्यात येतात. पालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या सर्वच नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात येतात. शासनाच्या तरतुदीप्रमाणे लाभार्थींना हक्काच्या घरासाठी मागणीचा पाठपुरावा करायला कसलीच हरकत नसल्याचे ढेंगळे यांनी सांगितले होते.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला मिळाले यश मागील २० ते २५ वर्षापासून घराचे मालकी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी येथील पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडे अनेकवेळा निवेदन देण्यात आली होती. २० जानेवारी रोजी ‘लोकमत’ मध्ये आलेल्या वृत्तामुळे आम्हाला प्रेरणा मिळावी व आमच्या हक्काची जाणीव झाली आणि सर्वच झोपडपट्टी हक्कांच्या घरासाठी मागणी लावून धरली, असे येथील काशीनाथ राठोड या लाभार्थ्याने सांगितले.