शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:10 IST

१२२ ऐवजी १६२ आसनी विमानामुळे प्रवाशांना दिलासा

औरंगाबाद : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि मागणी वाढल्याने गुरुवारी नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे जेट एअरवेजच्या विमानसेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जेट एअरवेजने सायंकाळपाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द केले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ एअर इंडियाच्या विमानाचाच पर्याय उरला आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी अधिक आणि विमानातील आसनक्षमता कमी, अशा परिस्थितीला एअर इंडियाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठे विमान आणण्यासाठी एअर इंडियाकडून प्रयत्न करण्यात आला.

एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, दिल्ली-औरंगाबाद-मुंबई मार्गावर आहे. प्रवाशांची मागणी वाढत असल्याने गत आठवड्यात मोठ्या आकाराचे विमान देण्याची मागणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली. गुरुवारी १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमान देण्यात आले. या विमानातून १५० प्रवाशांनी मुंबईचा प्रवास केला. प्रवासी कमी असल्याने शुक्रवारी मात्र नेहमीप्रमाणे १२२ प्रवासी क्षमतेच्या विमानाने उड्डाण केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ६ एप्रिलपासून सुरू होणार होते; परंतु आता या विमानाचे उड्डाण आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासी सुविधा
वरिष्ठ कार्यालयाने मागणी मान्य करीत गुरुवारी मोठे विमान दिले. त्यामुळे नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या विमानाने उड्डाण घेतले. त्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला, अशी माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAir Indiaएअर इंडिया