शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चिकूचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:15 IST

दुष्काळ झळा : पीक विम्यातूनही वगळले; पिशोर परिसरातील शेतकरी संकटात

- मुबीन पटेल

पिशोर (जि. औरंगाबाद) : यंदा दुष्काळामुळे पिशोरसह परिसरात चिकू उत्पादनात मोठी घट झाली असून, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. शिवाय शासनाच्या फळबाग पीक विम्यामध्ये चिकू या पिकाचा समावेश न केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

कन्नड तालुक्यातील पिशोर परिसर चिकूचे आगार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या जुन्या बागा येथे तग धरून आहेत. आठवड्यातून चार दिवस येथे चिकूचा बाजार भरतो. यात नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, बुलडाणा तर आंध्र प्रदेशमधील निजामाबाद व एदलाबाद येथून व्यापारी येत असतात. पिशोर परिसरात मुख्यत्वेकरून कालीपत्ती (गावरान) आणि गोलपत्ती हे चिकूचे वाण जास्त प्रचलित असून, खाण्यास चविष्ट व गोड असल्याने मागणी जास्त आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटी का होईना चिकूची बाग आहे. यामुळे दरवर्षी आर्थिक स्थिती थोडी मजबूत होण्यासाठी या बागा मोठा आधार आहेत. पिशोरसह दिगर, शफेपूर, रामनगर, खातखेडा, पळशी बु., पळशी खुर्द, कोळंबी, भारंबा, शाफियाबाद, भिलदरी, जवखेडा, मोहंद्री, वासडी, हस्ता, निंभोरा, पिंपरखेडा, नेवपूर, नागापूर, करंजखेडा, नाचनवेल आदी गावांतील शेतकºयांकडे चिकू बाग आहेत.

यावर्षी चांगले पर्जन्यमान होईल, या आशेवर बळीराजा होता. परंतु रबी हंगाम पिकांना फटका तर बसलाच सोबत चिकूच्या बागांनाही मोठी झळ बसली आहे. पाण्याअभावी फुलोरा न लागल्याने फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. परिणामी फक्त ३० ते ४० टक्के इतकेच उत्पादन झालेले आहे. गतवर्षी उत्पादन थोडे बरे होते; परंतु अनेक व्यापा-यांचे अंदाज चुकल्याने त्यांना तोटा सहन करावा लागला होता. यावर्षी मात्र व्यापारी ताकही फुंकून पीत असून, माल बघूनच बाग खरेदी करीत आहेत.

विम्यातून वगळले, दुष्काळी अनुदानही नाहीशासनाच्या फळबाग पीक विमा योजनेत चिकूचा समावेश न केल्याने शेतकरी हताश झाला असून, दुष्काळी अनुदानही मिळाले नाही. यामुळे परिसरात पाच हजारांच्या जवळपास चिकूच्या बागा असूनही कृषी विभागाने चिकूला डावलल्याने मोठी खंत असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळेdroughtदुष्काळFarmerशेतकरी