शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मेअखेरपर्यंत पूर्ण होईल बायपासचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये संथगतीने सुरू असलेल्या नवीन बीड बायपासच्या (बाह्यवळण रस्ता) कामाने आता गती घेतली असून मे २०२१ अखेर ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये संथगतीने सुरू असलेल्या नवीन बीड बायपासच्या (बाह्यवळण रस्ता) कामाने आता गती घेतली असून मे २०२१ अखेर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्धार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी व्यक्त केला आहे. या कामाला आलेले सर्व अडथळे संपुष्टात आले असून, सध्या या रस्त्याचे व उड्डाण पुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

पूर्वी बीड बायपास हा शहराबाहेर होता. आता वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे सध्याचा बायपास (बाह्यवळण रस्ता) शहरात आलेला आहे. या रस्त्यावर जडवाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर सध्याचा बायपास वाहतुकीसाठी अपुरा पडेल. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाने नवीन बीड बायपासचे काम सुरू केले. बीडकडून येणाऱ्या सोलापूर- धुळे महामार्गावर निपाणीपासून हा बाह्यवळण रस्ता सुरू झाला. तो पुढे सातारा डोंगराच्या अलीकडून वाल्मी, पैठण लिंकरोड (वाळूजकडे जाणारा), करोडी, माळीवाडा, कसाबखेडा मार्गे कन्नड असा गेला आहे.

सुरुवातीला हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता. परंतु, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि कंत्राटदाराला अर्ध्यावरच काम थांबवावे लागले. कोरोनाच्या भीतीपोटी या कामावरील परप्रांतीय मजुरांनी गावाकडचा रस्ता धरला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या बायपासचे काम रखडले. मात्र, अनलॉकमध्ये कंत्राटदाराने स्थानिक मजुरांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू केले. अलीकडे गावी गेलेले परप्रांतीय मजूर परतले असून सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चौकट....

नवीन बीड बायपासवर दोन उड्डाणपूल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले की, निपाणी ते कन्नडपर्यंत नवीन बीड बायपास गेला असून या रस्त्यावर वाल्मीजवळ आणि औरंगाबाद- पुणे रस्त्यावर ए.एस. क्लबजवळ असे दोन उड्डाणपूल उभारण्याची कामेही प्रगतीपथावर आहे. उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.