शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याला केले ‘बायपास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:39 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. मागील तीन दशकांपासून या टाक्यांचा वापरही सुरू होता. आता अचानक महापालिकेने चक्क पाण्याच्या टाक्यांचा वापर बंद करून थेट नागरिकांना पाणी देण्याची भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. मागील तीन दशकांपासून या टाक्यांचा वापरही सुरू होता. आता अचानक महापालिकेने चक्क पाण्याच्या टाक्यांचा वापर बंद करून थेट नागरिकांना पाणी देण्याची भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणी मिळणे बंद झाले आहे. ठिकठिकाणी व्हॉल्व्ह टाकून नागरिकांना पाणी देण्याची योजना आणण्यात आली आहे.शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडीहून शहरात पाणी आणते. फारोळा येथे जलशुद्धीकरणात पाणी शुद्ध करण्यात येते. त्यानंतर नक्षत्रवाडी येथे महाकाय पाण्याची टाकी (एमबीआर) बांधली. मागील तीन दशकांपासून या टाकीचा वापर सुरू होता. या टाकीतून शहर आणि सिडको-हडकोला पाणी देण्याची व्यवस्था होती. नक्षत्रवाडी येथील उंच टेकडीवर ही टाकी बांधलेली आहे. आज ही पाण्याची टाकी बांधायची म्हटले तर किमान ५० ते ६० कोटी रुपये खर्च येईल. महापालिकेने मागील दीड वर्षापासून या टाकीचा वापर बंद करून नक्षत्रवाडीहून थेट शहरात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी झाले आहे. ज्या तज्ज्ञांनी ही टाकी बांधली त्यांना पाणीपुरवठ्यातील काहीच कळत नव्हते का...? असा प्रश्न बायपास पद्धतीमुळे उपस्थित होत आहे. महापालिकेने आज या पाण्याच्या टाकीचा वापर बंद केला आहे. उद्या पुन्हा त्यात पाणी टाकल्यास टाकीला तडे जातील. कोट्यवधींची मालमत्ता धुळीस मिळेल याची चिंताच कोणाला नाही.ज्युबिलपार्क पाण्याच्या टाकीवरून विद्यापीठ, पहाडसिंगपुरा आदी वसाहतींना पाणी देण्यात येते. यासाठी विद्यपीठ आणि पहाडसिंगपुºयात पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. या टाक्यांचा वापर बंद करून महाापलिकेने थेट बायपास पद्धतीने पाणी देणे सुरू केले आहे. ठिकठिकाणी लाईन पंक्चर करून व्हॉल्व्ह बसविण्यात येत आहेत. सध्या बेगमपुरा भागात बायपास करण्यासाठी काम सुरू आहे. मकबºयाच्या पाठीमागेही अशाच पद्धतीने बायपास करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेने बायपासने पाणी देणे सुरू केले. या प्रक्रियेला लोकप्रतिनिधीही विरोध करायला तयार नाहीत.