शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात जलस्त्रोतांनी गाठला तळ

By admin | Updated: July 7, 2014 00:08 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईतालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट तालुक्याला भेडसावत असून ठिकठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्याचे खरीप हंगामाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ७४ हजार ८५३ हेक्टर आहे. यापैकी घाटनांदूर परिसरात १९३३ हेक्टर, बर्दापूर २६.६ हेक्टर, लोखंडी २५ हेक्टर, अंबाजोगाई १५ हेक्टर तर पाटोदा परिसरात कुठेही पेरणी झाली नाही. तालुक्यात केवळ १९९९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर तालुक्यातील उर्वरित ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात एवढया मोठ्या प्रमाणात पेरण्या रखडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई व परिसरात होणाऱ्या अत्यल्प पावसामुळे अगोदरच या तालुक्याची स्थिती दुष्काळसदृश्य होती. त्यातच पुन्हा यावर्षीही पावसाने दडी मारल्याने शेत्तकरी हवालदिल झाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग व तीळ ही पिके आता उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी न झाल्यास हे पीकही पुन्हा संकटात सापडणार असल्याने शेतीचे काय? हा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात अत्यल्प पावसामुळे गेल्या तीन वर्षात अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाने तळ गाठल्याने अंबाजोगाईकरांना महिन्यातून केवळ दोन वेळाच पाणीपुरवठा होतो. तर ग्रामीण भागातही जलस्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील ५२ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. ४२ गावांमध्ये ५३ विंधन विहिरी व विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र अधिगृहण केलेल्या या विहिरींनी तळ गाठल्याने पाणी प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ८३ हातपंप, १० विद्युत पंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. ज्याठिकाणी पाण्याची उपलब्धता असली तरीही भारनियमनामुळे आहे हे पाणी मिळणेही ग्रामस्थांसाठी दुरापास्त झाले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जून, जुलै महिना मे पेक्षाही कडक उन्हाचा ठरू लागला आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न झाला तर शेतकऱ्यांना दुष्काळ स्थितीचा मोठा सामना करावा लागणार आहे. याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण तालुक्यालाच मोठ्या तीव्रतेने भेडसावणार आहे.