शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू

By विजय सरवदे | Published: April 01, 2023 11:58 AM

नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेपेक्षा त्यांच्या इतर साहित्यातून भारतीय समाजाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. घटना लिहिताना मर्यादा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे व्यक्त होता आले नव्हते. भारतीय समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्ती आहे, असे प्रतिपादन ‘जयभीम’ चित्रपटाचे प्रणेते तथा मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. चंद्रू यांनी केले. 

नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते किशोर कदम (सौमित्र) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठीतून सिद्धार्थ मोकळे यांनी, तर इंग्रजीतून डॉ. उत्तम अंभोरे यांनी केले. चंद्रू यांचा परिचयही डॉ. अंभोरे यांनी करून दिला.

यावेळी न्यायाधीश चंद्रू म्हणाले, १९७५ साली आणीबाणीच्या काळात आणि आताच्या काळात माध्यमावर असलेली बंधने सारखीच आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांनी बाबासाहेबांचा विचार समजून घेतला पाहिजे. आता सध्या अमेरिकेमध्ये जातीवादाचा प्रश्न उद्भवला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० च्या दशकातच याबद्दल सूतोवाच केले होते की, भारतीय माणूस जेथे जेथे जाईल, तेथे जातीचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे अशा व्यवस्थेविरुध्द आपणास सजगपणे आवाज उठविणे गरजेचे आहे.

चित्रपटाचा समाजमनावर परिणामयावेळी ‘चित्रपटातील समाज वास्तव आणि वास्तवातील समाजमन’ या विषयावर किशोर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. व्यावसायिक आणि वास्तववादी चित्रपटाचे हे दोन प्रकार आहेत. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर प्रबोधनासाठीही चित्रपट असतात. समाजामध्ये वास्तवात जे घडते, ते चित्रपटातून दाखविले जाते. चित्रपटाचा समाजमनावर परिणाम होत असतो. अलीकडे जातीय व्यवस्थेवर चित्रपटातून कथानक दाखविले जाते, असे सांगून आतापर्यंत चित्रपटात केलेल्या भूमिका व राष्ट्रीय पुरस्काराची हुकलेली संधी यावर कदम यांनी भाष्य केले.

नागसेन गौरव पुरस्कारयावेळी के. चंद्रू यांच्या हस्ते भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांना धम्मचळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल नागसेन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबत डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. तुषार मोरे, के. एम. बनकर, भीमराव सरवदे, ॲड. सुनील मगरे, ॲड. सी. एस. गवई, ॲड. सिद्धार्थ उबाळे, ॲड. नितीन मोने यांचा सत्कारही चंद्रू यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन