शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यकांना भवितव्याची चिंता

By admin | Updated: June 20, 2017 00:29 IST

राज्यातील कृषी आणि मृद व जलसंधारण विभागांचे विभाजन करण्यात आले असून कृषी विभागातील पदोन्नतीची पदे मृद व जलसंधारण विभागाने स्वत:कडे घेतली आहेत.

कृषी विभागाचे विभाजन : कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील कृषी आणि मृद व जलसंधारण विभागांचे विभाजन करण्यात आले असून कृषी विभागातील पदोन्नतीची पदे मृद व जलसंधारण विभागाने स्वत:कडे घेतली आहेत. त्यामुळे कृषी सहाय्यकांना आपल्या भवितव्याची चिंता लागली. कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यासाठी कृषी सहायकांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.कृषी विभागापासून वेगळा होऊन मृद व जलसंधारण विभाग स्थापन करण्यात आला असून त्याचा शासन निर्णय ३१ मे रोजी जारी करण्यात आला आहे. या विभाजनानंतर दोन्ही विभागाचा सुधारित आकृतिबंध कसा असेल, याबाबत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिंता करीत आहेत. मृत व जलसंधारण विभागाने कृषी सहायकांना पदोन्नतीद्वारे मिळणारी सर्वच पदे ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे कृषी सहायकांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याकरिता कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व म. रा. कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पुसदेकर, कार्याध्यक्ष गोकुलदास पाटील, सचिव आनंद खोब्रागडे, कोषाध्यक्ष श्रीकांत ठवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू ढोले यांनी केले. आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाकमोडे, किशोर टोंगलवार, नरेश कुंभारे, विनोद निमगडे, सुनीता खोब्रागडे, वर्षा मानकर, मनिषा भंडारवार, मोनाली वरघंटे, आर. जी. तुमडाम, ए. आर. गेडाम, अनिल भोई, वाय. एस. केळकर, पी. एन. ढाकणे, संदीप दातारकर आदी सहभागी झाले.१२ जूनपासून बेमुदत आंदोलनकृषी सहायकांच्या संघटनेने १२ ते १४ जूनदरम्यान कार्यालयात काळी फीत लावून काम केले. त्यानंतर १५ ते १७ जून या कालावधीत लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धरणे देऊन निदर्शने करण्यात आली. आता २१ ते २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयापुढे धरणे देण्यात येतील. १ जुलै रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर मोर्चा आयोजित करण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास १० जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.