शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM

साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली.

ठळक मुद्देआठ एकरात नऊ लाखांचे उत्पादन, बेरोजगारीवर मात करून फुलविली टरबूज शेती

अमोद गौरकर।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : वडिलांनी शेती पिकवून मुलाला उच्चशिक्षित केले. नोकरी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण झाले नाही. अखेर मुलांनीच वडीलाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी नदीच्या पात्रात पिकणारी टरबूज शेती थेट शेतीच्या बांधावर पिकवून उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने टरबूज शेती करण्याचा सल्ला दिला. नदीपात्रात पिकणारे टरबूज शेतीच्या बंधावर कसे पिकवायचे याची माहिती दिली. त्यामुळे रब्बी हंगामात टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या आठ एकर शेतात लागवड केली.हर्षल माने यांच्यासोबतच शंकरपूचे मंडळ अधिकारी आर. के. निखारे, कृषी सहाय्यक पी. टी. भगत, पी. वाय. नंद, वाय. डब्लू रघुते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यात आठ एकरमध्ये नऊ लाखांचे पीक घेतले. यांच्या सोबतच बाळू पांगुळ यांनीही टरबूज लागवड करून भरघास पीक घेतले. नदी पात्रात टरबूज शेती केल्याने पाणी कमी लागते. मात्र, शेतीत याचा खर्च वाढण्याचा धोका असतो. अशावेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टरबूजसाठी पोषक ठरले. मनात इच्छा असली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळत असते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने व नवनवीन पिके घेऊन शेती करावी, असे आवाहन रोशन पांगुळ यांनी केले.लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटलेनदीपात्राऐवजी शेतात टरबूज लागवड केल्याने यासाठी चार लाखांचा खर्च आला. खर्च वजा करून पाच लाखांचा नफा झाला. हा नफा पुन्हा वाढला असता. परंतु, लॉकडाऊनमुळे मोठी बाजारपेठ मिळाली नाही, अशी माहिती रोशन पांगुळ यांनी दिली.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती टाळावीचिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. अनेक शेतकºयांचा शेती करण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असल्याने दरवर्षी मोठे नुकसान होते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी नवीन नगदी पिके घ्यावी, असा सल्ला रोशन पांगुळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती