लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील निराधार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही योजना त्यांना आधार ठरत होती. मात्र मागील चार महिन्यांपासून त्यांना मानधन मिळले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. लॉकडाऊन असल्याने सर्वच कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार थकित राहिल्यास मोठी ओरड होते. मात्र निराधारांचे वेतन थकित असूनही याकडे संबंधित अधिकाºयांचे लक्ष नसल्याची ओरड होत आहे.४५ अंश तापमानात बॅकेत चक्कराजिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडचण असल्याने निराधार भर उन्हात मानधनासाठी चकरा मारत आहेत. मात्र त्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. अनेक बँकेचे कर्मचारी त्यांच्याशी उद्धट वागणूक देत असल्याची माहिती आहे.
चार महिन्यांपासून निराधारांना मानधनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST
निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
चार महिन्यांपासून निराधारांना मानधनाची प्रतीक्षा
ठळक मुद्देसंजय गांधी निराधार योजना । लॉकडाऊ नमध्ये आर्थिक अडचण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}