शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्ण झपाट्ट्याने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 5:00 AM

नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

ठळक मुद्देकोरोना झाला नसेल ना, ही सतावतेय भीती

  लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक दहशतीत असतानाही वातावरणातील बलामुळेही आरोग्यावर परिणाम पडत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात खोकला, ताप, साथीच्या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कोरोना तर झाला नसावा ना? अशी भीती प्रत्येकांच्या मनात घर करीत आहेत.नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. 

थंड पदार्थ खाणे टाळाआता हिवाळ्यातही आईसक्रीम, शितपेय सहज उपलब्ध होतात. अनेकजण ते मोठ्या आवडीने खातात. मात्र असे पदार्थ खाणे टाळावे त्यासोबतच आंबट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कामाशिवाय बाहेर पडू नये. अशा सूचना डाॅक्टरांनी दिल्या आहेत.

अनेकजणांना थंडीचे वातावरण सहन होत नाही. त्यामुळे उणी कापड्यांचा वापर करावा, विषाणूमुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे  बाहेर निघताना बचाव करावा, तसेच स्वत:ची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. - निवृत्तीनाथ राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या