शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला.

ठळक मुद्देउमा नदीचे नैसर्गिक पात्र संपुष्टात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सदर कामासाठी रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, डोंगरगांव ते रत्नापूर या रस्त्याचे तसेच उमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. याच पुलाजवळ माती तस्करांनी मोठमोठे खड्डे करून तस्करी सुरु केली आहे. यामध्ये शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रातील खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. या कामाला सुरुवात झाली असून नदीवरील पुलाचे पिल्लरसुद्धा उभे झाले आहे.मात्र सदर कामाच्या बाजुने नदीपात्रातून पोकलॅन्डव्दारे मोठ्या प्रमाणात मातीचे खनन केले जात आहे. त्यामुळे पात्रामध्ये ७ ते ८ फुट खोल खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खनन प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हामहासचिव राकेश रत्नावर यांनी प्रशासनाकडे केली आहे.अपघात झाल्यास जबाबदार कोणमौजा डोंगरगांव येथील नदीघाटावरून मातीचे खनन केल्या जात असल्यामुळे काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्यात सदर खड्डे पाण्याने भरतील त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण जाणार आहे. परिणामी एखाद्यावेळी अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याच्या काही अंतरावरच स्मशानभुमी आहे. येथे मोठ्या संख्यने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेकडो ब्रास मातीची चोरीपोकलॅन्डच्या माध्यमातुन नदीतून मातीचे खनन केले जात आहे. हायवाद्वारे ही माती इतरत्र नेली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे दिसत आहे.डोंगरगांव-रत्नापूर मार्गावरील नदीपात्रातील मातीच्या खननाबाबत पथकाद्वारे चौकशी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास खनन करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- डी. जी. जाधव, तहसीलदार, मूल

टॅग्स :riverनदी