शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उपचार करण्यासाठी तेलंगणा राज्यात धाव; मात्र रुग्ण दगावल्यास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 17:31 IST

Chandrapur news कोराेनाबाधित रुग्णांना जीव वाचविण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते. मात्र, तेथील कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण दगावल्यास मृतदेह थेट नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात आहे.

ठळक मुद्देतेलंगणातील कोविड सेंटरमधील प्रकार संबंधित गावात शववाहिकेला अटकाव

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणे कठीण होत आहे. काही रुग्णांना प्राणवायूची गरजे भासते. त्यावेळी प्राणवायू उपलब्ध होत नाही. परिणामी, कोराेनाबाधित रुग्णांना जीव वाचविण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते. मात्र, तेथील कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण दगावल्यास मृतदेह थेट नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात आहे.

विशेष म्हणजे, तो मृतदेह घेऊन नातेवाईक गावात आल्यास, संबंधित ग्रामपंचायत मृतदेह घेऊन गावात येण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळे नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, तालुक्यातील १० ते १५ कोरोनाबाधित रुग्ण तेलंगणा राज्यातील मंचेरीयाल येथे उपचारादरम्यान दगावले. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर त्याच ठिकाणी अंत्यसंकार करणे गरजेचे आहे. मात्र, तेथील वैद्यकीय यंत्रणा कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द करत आहे. तो मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आणल्यानंतर, त्या गावात अंत्यसंस्काराची वेगळी स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे त्या कुटुंबीयांतील नागरिकांनाही कोरोनाची बाधा होत आहे. परिणामी, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याप्रमाणे, कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द करताना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जात नाही.

विसापूर ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

या गंभीर प्रकाराबाबत काहीतरी उपाययोजना तत्काळ होणे आवश्यक असल्याने, विसापूर ग्रामपंचायतीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यानंतर परस्पर मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द न करता, तेलंगणा राज्यात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश देऊन उपाययोजना करावी, कोरोनाबाधिताचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात येऊ नये, याबाबत तेथील प्रशासनाला निर्देश द्यावे किंवा जिल्ह्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस