शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

रिपब्लिकन पार्टीच्या युवक अध्यक्षपदी वृषभ गुळधाने चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्षपदी वृषभ सुधाकर गुळधाने ...

रिपब्लिकन पार्टीच्या युवक अध्यक्षपदी वृषभ गुळधाने

चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्षपदी वृषभ सुधाकर गुळधाने यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी निवड केली आहे. नुकतेच त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्ष संगठन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मान त्यांनी व्यक्त केला आहे.

रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी

चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेकजण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात. परंतु, येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने अपघाताची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चंद्रपुरातील क्रिष्णनगर येथे वृक्षारोपण

चंद्रपूर : येथील क्रिष्णनगर परिसरातील सरस्वती शिक्षण महिला मंडळाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम छोटू तिघाडे यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी कार्यक्रम केंद्राचे प्रमुख घनश्याम कामकार, उपनिरीक्षक सुनंदा कोवे, पूनम बांबोळे, विजय घोडमारे, रवि घोरघाटे, राजेश क्षीरसागर, रंजना आसुटकर, कल्याणी रायपुरे, समीर बोरकर आदी उपस्थित होते.

बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी

चंद्रपूर : येथील बसस्थानकाचे काम मागील अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे बस लावण्यासाठी बसचालकांना मोठी अडचण होत आहे. याचा फटका प्रवाशांनासुद्धा बसत आहे. कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते. परंतु, बसस्थानकाचे काम संथगतीने सुररू असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.

महागाई कमी करण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्ज वितरण मोहीम राबवावी

चंद्रपूर : कोरोनाने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी अनेकजण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठी अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याने त्याचा फायदा मिळत नाही.