शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM

सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : कोरोनाच्या दहशतीने डोळ्यात आणले पाणी

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : खरीप हंगामातील उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी यावर्षी पहाडावरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रीत केले. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी पिकेही दमदार आली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या दहशतीत शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.सेवादासनगर येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी येथील सरपंच विमल राठोड यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक आडवे झाले आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आली तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. ही तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी खत, कीटकनाशक आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मात्र हा हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे रब्बीनेही शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले नसल्याचे स्थिती आहे. एकिकडे कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा यामध्ये पहाडावरील शेतकरी अक्षरश: दबला गेला आहे.यंदा रब्बी हंगामातील पिके चांगली आली होती. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.- संजय चव्हाणशेतकरी, सेवादासनगर.अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे.- विमल राठोड,सरपंच, नोकेवाडा

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती