शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील औषध पुरवठ्याचे प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, ...

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोविड आजारातून बाहेर पडल्यानंतर रुग्णांची साखर वाढणार नाही, याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. यावर विशेष लक्ष दिल्यास रोगावर मात करता येऊ शकेल. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे; पण मृत्यूदर वाढत आहे. त्यासाठी विविध कारणे समोर येत आहेत. त्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला दिल्या.

आयसीयु वार्डात गंभीरतेने लक्ष द्या

आयसीयू वार्डातील रुग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रुग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रुग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रुग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रुग्णांचे मास्क निघून ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ शकतो. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

म्युकरमायकोसिससाठी वेगळा कक्ष

म्युकरमायकोसिस रोगाच्या उपचारासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, डोळेदुखी, डोळ्यांवर सूज व नाक बंद होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास कक्षाशी संपर्क साधावा. या रोगावर तातडीने उपचार, उपाययोजना व जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.