शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

मागण्या पूर्ण होतपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार : शासनस्तरावर पाठपुरावा करूनही उपयोग नाही चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा ...

मागण्या पूर्ण होतपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार : शासनस्तरावर पाठपुरावा करूनही उपयोग नाही

चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही तसेच येथील विद्यार्थी १८ वर्षांच्या वर झाले असतानाही शासनाने त्यांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे संस्थेला अकारण त्यांचे पालनपोषण करावे लागत आहे. दुसरीकडे अनुदान नसल्याने उसनवारीवर खर्च सुरू आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी, कर्मचारी उपोषणाला बसले असून या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करा, नाही तर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासननियमानुसार संस्थेमध्ये १८ वर्षांच्या वर गतिमंद विद्यार्थ्यांना ठेवता येत नाही तसेच त्यासाठी शासन कोणतेही अनुदानही देत नाही. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे लागते. मात्र, या संस्थेत असलेले विद्यार्थी हे काम करण्याच्या स्थितीत नसल्याने आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. यासंदर्भात संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करा नाही तर संस्थेला अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र, शासन तसेच स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी संस्था चालविणे तसेच या मुलांचे पालनपोषण करणे आता कठीण झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

स्वतंत्र भारतात गतिमंद विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ आली, ही दुदैवाची बाब असल्याचे मत संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी व्यक्त केले असून जोपर्यंत शासन यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.