शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र सर्व ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणारे मोफत पाठ्यपुस्तक अद्यापही विद्यार्थ्यांच्या हातात पडले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाइन शाळा करावी लागत आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे, दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात होती.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी शिक्षण विभाग उन्हाळ्याच्या सुट्यांच्या दिवसापासूनच नियोजन करतात. यावर्षीही बालभारतीकडे १ लाख ५७ हजार ५७८ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची नोंदणी केली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे यावर्षी पुस्तकांची छपाई बालभारतीकडून थांबली होती. परिणामी शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही पुस्तक पडले नाही. दरवर्षी नवीन पुस्तकांची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. यावर्षी ना शाळा, ना पुस्तक अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय विद्यार्थी

चंद्रपूर २०,७७६

भद्रावती ८५७२

वरोरा १३,५४०

चिमूर १३,९९४

ब्रह्मपुरी १४,६१३

नागभीड ११,५१८

सिंदेवाही १०,३४४

मूल १०,६१०

सावली ९४३२

पोंभुर्णा ४००४

गोंडपिपरी ७७७२

बल्लारपूर ६१७७

राजुरा १०,०६२

कोरपना ९५८३

जिवती ७५८१

एकूण-१,५७,५७८

--

सहा हजार विद्यार्थ्यांनीच केली पुस्तके परत

यावर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या कोणत्याच वर्गाचा अभ्यासक्रम बदलला नाही. त्यातच मागील वर्षी शाळाही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे मागील वर्षीचे पुस्तके चांगल्या स्थितीत होते. या पुस्तकांचा पुनर्वापर होऊ शकतो यासाठी जिल्ह्यातील ६ हजार पालकांनी आपल्याकडील पुस्तके शाळांना परत केली आहेत. अन्य पालकांनीही वापरलेली पुस्तके शाळांना परत केल्यास दरवर्षी होणारा खर्च काही प्रमाणात का होईना टाळता येईल.

बाॅक्स

पुस्तक नाही, अभ्यास कसा करायचा?

दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात होती. यावर्षी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होऊन पंंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके नाही. केवळ ऑनलाइन अभ्याक्रमावर भर दिला जात आहे. मात्र पुस्तकच नाही तर अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न सध्या विद्यार्थी उपस्थिती करीत आहे. विशेष म्हणजे, सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी या अभ्यासक्रमापासून विद्यार्थी वंचित आहेत.

कोट

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या लक्षात घेऊन बालभारतीकडे पुस्तकांची नोंदणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पुस्तके येत आहे. काही पुस्तके आली असून, अन्य विषयांचेही पुस्तक लवकरच प्राप्त होईल.

- दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प., चंद्रपूर