शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

16 लाख 41 हजार 829 हजार नागरिकांना कोरोना लस देणे डोंगराएवढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे.

ठळक मुद्देलस तुटवड्याचे संकट : लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर क्षेत्र व जिल्हाभरात १७५ केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागणीनुसार कधीच पुरवठा झाला नाही. दोन दिवस झाले की केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की येत आहे. नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये आधीच्याच वयोगटाला लस मिळत नसताना केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील १६ लाख ४१ हजार ८२९ हजार पात्र नागरिकांना लस देणे आरोग्य विभागासाठी डोंगराएवढे आव्हान राहण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. १७५ लसीकरण केंद्रांमध्ये सुमारे  दोन हजार जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेवकांचाही समावेश आहे.

मागणी लाखाची पण मिळतात हजार !जिल्ह्यात दररोज सरासरी लसीकरण तीन ते चार हजार आहे. परंतु, मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे दोन दिवसातच लस  संपून जाते. दररोज १० हजार डोस मिळाले तरच लसीकरण आणखी वेगाने होऊ शकते. १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण युद्धस्तरावर राबविण्याची चंद्रपूर मनपा व जिल्हा आरोग्य प्रशासनाची तयारी आहेत.   परंतु, डोस किती मिळतात यावरच अवलंबून राहणार आहे. 

दुसऱ्या डोससाठी गोंधळ उडणारजिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून सुरू झाला. केंद्र सरकारने आता २८ दिवसांऐवजी सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांनाच दुसरा डोस पुढे गेला. त्यातच आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण घोषित झाल्याने केंद्रात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

२ लाख ९५ हजार २३ जणांनी घेतली लसजिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २ लाख ९५ हजार २३ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध मिळाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र,आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस