शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विंजासन येथील ऐतिहासिक बुद्धलेणी

By admin | Updated: May 4, 2015 01:22 IST

बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे.

सचिन सरपटवार  भद्रावतीबौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे. त्यात पाच एकर जमिनीवर टेकडी वसलेली आहे. २५०० हजार वर्षांपूर्वीची ही लेणी असून भिक्खू सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरून भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी येऊन गेले व इथूनच ते अंबतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात. ही बुद्ध गुंफा दोन भागात खोदण्यात आली असून पहिल्या भागात सभागार व शून्यागार कोरण्यात आले आहे. नंतर राजा हर्षवर्धनाच्या काळात बुद्ध मूर्ती कोरण्यात आली. भद्रावतीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला विंजासनच्या टेकडीत बुद्धगुहा आहे. या टेकडीत ७१ फूट अंतरावर लांब सज्जा काढलेला आहे. येथे एकूण तीन गुंफा असून पहिल्या गुंफेची लांबी ७४ फूट व रूंदी २० फूट आहे. यामध्ये गौतम बुद्धांची ध्यानमुद्रेत कोरलेली मूर्ती ११ फूट तीन इंचाची असून रंग तांबूस आहे. दुसरी गुंफा ४७ फूट लांब असून २० फूट रुंद आहे. यामध्ये सात फूट एक इंच आकाराची असलेली बुद्धांची मूर्ती आहे, तर तिसरी गुंफा ३५ फूट लांब असून मूर्ती ८ फूट चार इंच इतकी आहे. विंजासन या नावाचा अपभ्रंश करण्यात येऊन या गुहेला विजासन म्हटले जाते. पूर्वी या गुहा विद्येचे आसन होत्या. या बौद्ध भिक्खूंना विद्या दिली जाते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.संतराम बी.ए. यांचे शशीम प्रश्न व भद्रावतीची प्राचीन बौद्ध संस्कृती यातील साम्य हा आकर्षणाचा विषय होता. ‘शशीम प्रश्न’ या पुस्तकातील वर्णनानुसार बौद्ध साम्राज्ये व बौद्ध संस्कृतीचा विध्वंस सुरू झाला तेव्हा विदर्भातील एक बौद्ध भिक्खू सुमेध या संकटाची बातमी बौद्ध राजांना देण्यासाठी निघाले. ते भद्रावती राज्याच्या सीमेपर्यंत आले. तेव्हा अंधार पडला होता. ते फार थकलेले होते. त्यामुळे त्यांनी सीमेवरील पहाडावरच विश्रांती घेतली.दुसऱ्या दिवशी त्यांनी तेथील नागवंशीय बौध्द राजा भद्रशील यांची भेट घेवून सर्व वृत्तांत सांगितला. राजाचा महाल एका परकोटात असून आत दगडांनी बांधलेली पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीतून पश्चिमेस एक भुयारी मार्ग आहे. तेथे एका पहाडातील प्रशस्त दालनात तथागत बुध्दांची सुवर्णाची प्रतिमा असून सुवर्ण पत्रात धम्म ग्रंथ ठेवले आहेत. सकाळी याच मार्गाने परतल्यानंतर राजाने या बौद्ध संस्कृतीचा कुणी विध्वंस करू नये व पुढे बौद्ध जनांनी त्याचे संशोधन करून जतन करावे, या हेतूने ते भुयारी द्वार विटांचे बांधकाम करून बंद करून घेतले. आजही या विहिरीच्या आतील पश्चिमेकडील एकच भिंत विटांनी बांधून असलेली आढळून येते. भन्ते सुरेई ससाई यांना घेऊन विंजासन लेणीची पाहणी केली. तेव्हा या लेणीत पूर्व-उत्तर व दक्षिण मुखी तीन द्वार असून आत तीन मोठी दालने व पहाडात कोरलेल्या तथागत बुद्धांच्या तीन भव्य प्रतिमा असल्याचे आढळून आले.त्यावेळी लेणी परिसर व इतरही ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे भग्नावशेष आढळून येत असत. परंतु आता अनेक स्थळे ओस पडली आहेत. अनेक स्थळांचे मूळ रूप नष्ट करण्यात आले आहे. या सर्व स्थळांचे निरपेक्ष भावनेने संशोधन, उत्खनन व जतन होण्याची आवश्यकता असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. संशोधन झाल्यास अनेक ऐतिहासिक बाबींचा अभ्यास करणे सोईचे होणार आहे.