शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ लग्नासाठी एकवटले गाव

By admin | Updated: January 13, 2016 01:05 IST

मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

\लोकवर्गणीतून पार पडला विवाह : विसापूरच्या पंचक्रोशीत आगळी-वेगळी घटनाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरमुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अठराविश्वे दारिद्र्यातील कुटुंबाला अधिकच अडचणीला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी चिंता सतावत असते. मात्र चिंतामग्न असलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सारे गाव एकवटले. लोकवर्गणीतून ‘तिचा’ विवाह सोमवारी थाटात पार पडला. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विसापूरच्या पंचक्रोशीत आगळ्या-वेगळ्या विवाहाचा प्रसंग प्रेरणा देणारा ठरला आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील मधुकर शिवरकर यांची मुलगी अनिता हिच्या लग्नाची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या कथानकात साजेसा प्रसंग घडला आहे. मधुकरच्या घरी पत्नी, दोन मुले व दोन मुली असे कुटुंब आहे. घरात दारिद्र्याने ३५ वर्षापूर्वीच ठाण मांडले आहे. अशातच अनिताच्या विवाहाचा प्रस्ताव आला. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील काशिनाथ घुबडे यांचे स्थळ आले. एकमेकांची पसंती झाली. लग्नाचा बेत आखण्यात आला. मात्र परिस्थिती आड येत होती. आईवडिलांना मुलीचे लग्न मोडणार तर नाही ना, ही चिंता सतावत होती. अशातच मुलीचे वडील मधुकर शिवरकर यांनी श्री पंढरीनाथ देवस्थानच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी आस्थेने विचारपूस केली. मुलीकडील परिस्थिती हलाखीची होती. मात्र काशिनाथ घुबडे याचे आईवडील हयात नसल्याची बाब समोर आली. नियोजित वधू-वराचे लग्न झालेच पाहिजे, असा दृढनिश्चय करण्यात आला. या लग्न समारंभाला ऐन विवाहाच्या तीन तास अगोदर लोकवर्गणीचा मार्ग अंगिकारण्यात आला. पाहतापाहता लोकवर्गणी जमा झाली. गावकऱ्यांनी आपल्याच मुलीचे लग्न समजून गावातील सरपंच रिता जिलटे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी लग्नात हिरहिरीने भाग घेतला. यात गावकऱ्यांचा पुढाकारही लाभला. सर्वांचा हातभार लागत असल्याचे पाहून मुलीकडचे पाहुणेही सद्गतीत झाले. वधूच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. लोकवर्गणीतून पार पडलेल्या विवाह सोहळ्याला समाधानाची सोनेरी किरण लाभली. एखाद्या चांगल्या व श्रीमंत कुटुंबातील लग्नाला लाजविणारा अनिताचा विवाह झाला. तिला निरोप देताना विवाहाला उपस्थितीत असलेले सारेजण हजर होते. एका गरीब मुलीच्या सुखी संसारासाठी आपला हातभार लागला. याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते.विशेष म्हणजे एकेकाळी मधुकर शिवरकर यांची विसापुरात एकमेव पान टपरी होती. २५ वर्षापूर्वी त्याच्या टपरीवरच वर्तमानपत्र वाचले जात होते. विड्याचे पान बनविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या पान टपरीवर पान खाणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र उधारीमुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले. परिस्थितीचे दृष्टचक्र ओढवले. सढळ हाताने मदत करणाऱ्यांवर याचना करण्याची वेळ आली. तरीही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावाच विसापूरकरांनी दिला आहे. पंचक्रोशीत हा प्रसंग दिर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.