शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ऐतिहासिक सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:39 IST

प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव जाहीर : नागरिकांना दोन महिन्यांच्या आत नोंदविता येणार हरकती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील इंग्रजकालीन ऐतिहासिक सराय (धर्मशाळा) इमारत वाचविण्यासाठी इतिहासप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर राज्य शासनाने मंगळवारी (दि. १५) राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्राथमिक अधिसूचना जाहीर केली. अधिसूचना जाहीर झाल्यापासून नागरिकांना दोन महिन्यांच्या आत याबाबत हरकती दाखल करता येणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालकांकडून या अधिसूचनेची प्रत संबंधित सराई स्मारकाजवळ लावावी, अशी सूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी दिली आहे. 

स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली इंग्रजकालीन 'सराय' जीर्ण होत आहे. या इमारतीची मालकी चंद्रपूर महानगर पालिकेकडे आहे. या जागेवर व्यावसायिक संकुल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १०० वर्षे जुन्या इमारतीचे जतन करण्यासाठी चंद्रपुरातील अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. 

२३ हजार ७०० रुपयांत उभी झाली होती, इंग्रजांच्या काळात चंद्रपुरातील सराई इमारत. राज्य शासनाने अखेर मंगळवारी (दि. १५) शासन निर्णय जारी केला. त्यामध्ये सराय धर्मशाळेला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्तावही जाहीर केला आहे.

राष्ट्रीय नेत्यांनी केला होता मुक्काम१९ फेब्रुवारी १९२७ रोजी चंद्रपूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वनाथ दीक्षित ऊर्फ बाबा पाटील आणि गृहमंत्री ई. राघवेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इमारतीसाठी दुर्मीळ सागवान लाकडाचा वापर झाला. बांधकामासाठी २३ हजार १०७ रुपये खर्च आला होता. महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, बॅरिस्टर युसुफ शरीफ, बॅरिस्टर अभ्यंकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी या इमारतीत मुक्काम केल्याचा इतिहास आहे.

उच्च न्यायालयातील लढ्याला मिळाले यशया संघर्षाची न्यायालयाने सकारात्मक दखल घेतली आहे. ही इमारत स्मारक करण्याच्या दृष्टीने नागपूर खंडपीठाने याबाबत पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना १५ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील सहायक संचालक मयूरेश खडके यांनीदेखील १८ डिसेंबरला राज्याचे संचालकांना सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करत अधिसूचनेसाठी प्रस्तावपाठविण्याबाबतचे पत्र दिले होते. 

असा आहे सराय इमारतीचा इतिहासचंद्रपूर शहरात येणारे वाटसरू व महत्त्वाच्या लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष माधवराव चेंडके यांच्या कार्यकाळात सराय बांधण्याची संकल्पना समोर आली. तेव्हा अनेकांनी लोकवर्गणी दिली. २ ऑक्टोबर १९२१ रोजी पायाभरणी झाली. तत्कालीन उपायुक्त जे. पी. बेहर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सहा वर्षांनी इमारत पूर्ण झाली.

टॅग्स :historyइतिहासchandrapur-acचंद्रपूर