शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे आधारभूत केंद्र शासनाने निर्माण केले आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकीय धान ...

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे आधारभूत केंद्र शासनाने निर्माण केले आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस रूपाने देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केला आहे. परंतु जाहीर केलेल्या निर्णयानुसार आजपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून चालू हंगामात बी-बियाणे, खते आणि मजुरांची मजुरी द्यायची कशी, असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्याचा हात देण्यासाठी शासनाने बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, अखिल गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार यांनी केली आहे.