शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राखी पौर्णिमेमुळे खासगी प्रवासी दरात भाडेवाढ; मुंबई, पुणेसाठी आता दीड हजार रुपये भाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

चंद्रपूर : तीन दिवसांवर राखी पौर्णिमा आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली ...

चंद्रपूर : तीन दिवसांवर राखी पौर्णिमा आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबई किंवा पुणेच्या प्रवासासाठी दीड हजार रुपयांपर्यंतचे दर आकारण्यात येत आहे.

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र कोरोेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. त्यातच राखी पौर्णिमा दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खासगी प्रवासी वाहनांनी आपल्या दरात वाढ केली असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

कोरोनामुळे अनेक खासगी ट्रॅव्हल्स बंद होत्या. केवळ मोजक्याच ट्रॅव्हल्स धावत होत्या. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या वाढली आहे. पूर्वी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी केवळ एक ते दोन ट्रॅव्हल्स धावत होत्या. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्याअंतर्गत धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्याही कोरोनामुळे कमी करण्यात आली होती. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ट्रॅव्हल्स धावत आहे. प्रवाशांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत दुप्पट ट्रॅव्हल्स धावत आहेत.

कोट

मागील काही महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये सततची वाढ होत आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात भाडेवाढ झाली आहे. कोरोनामुळे पॅसेंजरही पूर्वीप्रमाणे प्रवास करीत नाही.

- ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोट

मागील दीड वर्ष व्यवसाय ठप्प होता. आता काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यातच सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. परंतु, अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत नाहीत. डिझेल दरवाढीने अल्प वाढ केली आहे

- ट्रॅव्हल्स व्यावसायिक