शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक देणार जादा उत्पादनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM

पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे.

ठळक मुद्देनाविण्यपूर्ण उपक्रम : जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीला टाळून जास्त उत्पन्न घेणारे आणि सतत नाविण्याचा विचार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. या प्रगतीशील शेतकऱ्यांकडे इतरांना दिशा देणारे बरेच काही अनुभव गाठीशी असतात. अशा शेतकऱ्यांची रिर्सार्स बँक तयार केले जाणार आहे. या बँकेत जिल्ह्यातील प्रगतीशील पुरस्कारप्राप्त शेतकरीही सहभागी होणार आहेत.पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्या हंगामात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, किटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्या गावाजवळच मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.पिकांबद्दल शेतकऱ्यांना मिळणार तातडीने सल्लानिसर्गच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात सापडतात. त्यामुळे शेतात कोणती पिके घ्यावी, खते, कीटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांच्या गावाजवळच मिळावी यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्राप्त व नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची ह्यरिसोर्स बँकह्ण ची स्थापना झाली. त्याद्वारे गरजु शेतकऱ्यांना तातडीने सल्ला मिळणार आहे.नवीन तंत्रज्ञानाची माहितीशेतकऱ्यांना नव्याने उमेदीने पिके घेण्यासाठी कृषी सल्ल्याची गरज असते. अशावेळी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात. मात्र तरीही शेतकऱ्यापर्यंत आवश्यक माहिती पोहचण्यासाठी मर्यादा येतात. याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी