शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापुढे डेंग्यू, मलेरियाच्या साथींनीही फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

उन्हाळाच्या अखेरच्या टप्प्यातच वातावरण बदलामुळे आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. दरवर्षी आरोग्य विभागाला साथ आटोक्यात ...

उन्हाळाच्या अखेरच्या टप्प्यातच वातावरण बदलामुळे आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. दरवर्षी आरोग्य विभागाला साथ आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत होते. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, कोरोनाच्या साथीपुढे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने उद्भवणारे साथीचे आजार मात्र यंदा गायब झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा हिवताप विभागातर्फे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाभरात नागरिकांच्या तपासण्या केल्या. मात्र, त्यातील बोटावर मोजण्याइतकेच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या साथीपुढे पारंपरिक साथीच्या आजारानेही हात टेकल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मात्र, तरीसुद्धा नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.

बॉक्स

ही घ्या काळजी

१) घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. कुलरची टाकी स्वच्छ करावी. कुठेही पाणी साचू देऊ नये.

२) टायर, फुटके मडके, भंगार साहित्यामध्ये पाणी साचू देऊ नये.

३) आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाडावा. ताप आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.

-------

साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली आहे. सीएचओ, एमपीडब्ल्यूमार्फत प्रत्येक आठवड्याला सर्वेक्षण केले जात असून, गावागावांत जनजागृती केली जात आहे.

प्रतीक बोरकर, हिवताप अधिकारी, चंद्रपूर

बॉक्स

डबक्यांमध्ये गप्पी मासे

डास उत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तिगत सुरक्षाअंतर्गत मच्छरदाणीचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करणे आवश्यक आहे.

२) आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी गप्पी मासे पाळा, अशी मोहीम दरवर्षी राबविण्यात येत असते. त्यामुळे साथरोग टाळण्यास मदत होत असते.