शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

चंद्रपूर : कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, तणाव यामुळे मानसिक रुग्णांच्या आजारामध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांमध्ये ...

चंद्रपूर : कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, तणाव यामुळे मानसिक रुग्णांच्या आजारामध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती, त्यांना तीव्र लक्षणे जाणवत असल्याची भीती व्यक्त होत आहे. चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत ९ रुग्ण भरती आहेत तर मागील वर्षभरात ओपीडी व आयपीडीमध्ये ३,५९० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

वाढते धकाधकीचे जीवन, कामाचा ताण, कौटुंबिक कलह यामुळे अनेकांमध्ये नैराश्य निर्माण होते. त्यातच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, हातातील काम गेले, भविष्यासाठी जमा केलेली पुंजीही गमावण्याची वेळ आली. याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी अनेकजण डिप्रेशन (नैराश्य)च्या विळख्यात सापडले आहेत. मात्र, अनेकजण बदनामीला घाबरुन रुग्णालयात गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाली तर सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोरोनामुळे रुग्णालयात वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्येही तीव्र लक्षणे आढळून येत आहेत. सन २०२०मध्ये ओपीडीमध्ये ३,४१८ तर आयपीडीमध्ये १७२ रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आकडेवारी चिंताजनक आहे.

कोट

जिल्ह्यात मानसिक रोग नियंत्रण टीम कार्यरत आहे. यामध्ये मानसिक रोग तज्ज्ञ, समाजसेवा अधिकारी, स्टॉप नर्स, यांचा समावेश आहे. ही टिम प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला आठवड्यातून एक दिवस भेट देते. यावेळी अशामार्फत सौम्य, मध्यम व तीव्र रुग्णांची नोंद करुन सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तिथेच उपचार केला जातो. तर तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या जाते. कोरोनामुळे काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली असून भरती नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर.

कोट

कोरोनामुळे अनेक कुटुंब एकत्रित आले. त्यामुळे कौटुंबिक वादविवाद निर्माण झाला. रोजगार गेल्याने आर्थिक तणाव वाढला. तसेच कोरोनाची भीती व चिंता अशा कारणामुळे काही प्रमाणात मानसिक रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुळे उपचार घेत असलेले रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांनाही आता समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर.