शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र साडेतीन महिन्यांनंतर सरपंचाच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST

नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी ...

नागभीड : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिलेल्या निकालास स्थगिती देऊन स्पर्धेत असलेल्या गावांचे फेरमूल्यमापन करण्यात यावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २३ डिसेंबर, २०२०ला लिहिलेले पत्र तक्रारकर्त्या सरपंचांना तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मिळाले आहे.

दरम्यानच्या काळात फेरमूल्यांकनाबाबत काय प्रक्रिया झाल्या, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या संपूर्ण गावांच्या तुलनेत हे गाव तसूभर पुढेच होते. मात्र, राजकीय दबावापोटी दुसऱ्याच गावास पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली होती. हा कोटगाव या गावावर अन्याय असून, पुन्हा मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी माजी सरपंचासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली होती. फेरमूल्यांकन न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला होता.

१९५६ मध्येच आदर्श गावाची पताका फडकावणाऱ्या कोटगावने गेल्या काही वर्षात आदर्श ग्राम योजनेत अनेकदा सहभाग घेतला व पुरस्कारही प्राप्त केले. लोक सहभागाच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावात कोणताही सामुदायिक कार्यक्रम असो, या गावाने कधीच पाय मागे घेतले नाही. या वर्षीही जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला आणि या गावात वेगळाच हुरूप निर्माण झाला.

बॉक्स

सर्व अटी केल्या पूर्ण

स्मार्ट ग्रामच्या ज्या काही अटी, नियम आहेत, त्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी या गावाने कंबर कसली आणि लोकसहभागाने कोटगाववासीयांनी अनेक कामे पूर्ण केली.

मूल्यांकनासाठी आलेले अधिकारी गावात आले. गावाची तपासणी केली, पण माहितीपत्रक घेऊन गेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करा, आपले गुण नक्कीच वाढतील, असा सल्लाही या अधिकाऱ्यांनी दिला. या स्मार्ट ग्राम स्पर्धेचा निकाल आला, तेव्हा गावकऱ्यांना चांगलाच धक्का बसला. कारण निवडीत कोटगावला वगळण्यात आले होते. या अन्यायाविरोधात १० डिसेंबर, २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

कोट

स्मार्ट ग्राम निवडीत कोटगाववर झालेल्या अन्यायाची तक्रार मी १० डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. २३ डिसेंबर, २०२०ला जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी काही सूचना दिल्याचे पत्रावरून दिसून येते. मात्र, मला या सूचना ९ एप्रिलला प्राप्त झाल्या. स्मार्ट ग्राम फेरमूल्यांकनाबाबत मधल्या काळात काय प्रक्रिया झाल्या, याबाबत मी व गावकरी अनभिज्ञ आहोत.

- यशवंत भेंडारकर, तक्रारकर्ता व विद्यमान उपसरपंच, कोटगाव