शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ९९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

मंगल जीवने बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा ...

मंगल जीवने

बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा १७० टक्क्याने वाढला आहे. पीक आता वर आले आहे. दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु पुनर्वसू नक्षत्राची रिमझिम सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

तालुक्यात यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लवकर सुरू झाल्या. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र संपेपर्यंत ९९ टक्के पेरण्या आटोपल्या. परंतु आर्द्रा नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले व पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागलेले डोळे सुखावले आहे. बल्लारपूर तालुक्यातील ३५ गावांमध्ये सात हजार नऊपेक्षा जास्त शेतकरी बांधव असून, तालुक्यामध्ये सात हजार ७८१ हेक्टर एवढे खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. आतापर्यंत चार हजार ५४९.९० हेक्टरवर बळीराजाने सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची लागवड केली आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मागच्या वर्षी ३५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. यंदा यात ५९७ हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचा पेरा १७० टक्क्यांनी वाढला आहे.

भात पिकाचे सरासरी क्षेत्र दोन हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी आवत्या २.५०, तर रोहिणी ५.४० हेक्टरवर झाली आहे. भातपिकाला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी कापसाचा पेरा तीन हजार ७९१ हेक्टर होता. यावर्षी मात्र तीन हजार ५३८ हेक्टरवर थांबला आहे. कडधान्य पेरणी ५१३ हेक्टर पैकी ३६०.४० हेक्टरवर झाली आहे. हळद, मिरची, भाजीपाल्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे तर खरीप ज्वारी, मका, तीळ, फुलशेती व इतर कडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

कोट

तालुक्यात मागील आठवड्यात ८० टक्के पेरणी झाली होती व आता ती ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. यावर्षी शेतकरी बांधवांचा ओढा सोयाबीन पेरणीकडे वळल्याने सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे.

- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर

बॉक्स

एकूण पेरणी क्षेत्र - ७७८१ हे.

झालेली पेरणी - ४५४९ हे.

सोयाबीन- ५९७ हे.

कापूस- ३५३८ हे.

तूर- ३५८ हे.

080721\20210708_102127.jpg

सोयाबीन चे वर आलेले पीक.