शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांच्या तावडीतून ४० गायींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

बल्लारपूर: येथील दहेली-कळमना या महामार्गावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास गायींनी भरलेला ट्रक (एमएच ३४ बी एल २४५१) पकडण्यात ...

बल्लारपूर: येथील दहेली-कळमना या महामार्गावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास गायींनी भरलेला ट्रक (एमएच ३४ बी एल २४५१) पकडण्यात आला. या ट्रकमधून जवळपास ४० गायींना कोंबून नेले जात होते. या सर्व गायींची सुटका करून लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले.

संशयाच्या आधारावर गोरक्षकांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न अयशस्वी ठरला. ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक पळविला; परंतु ट्रकच्या मागचे चाक पंक्चर झाले आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक फरार झाला. गोरक्षकांनी लगेच त्यांचे सहकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेंद्र तिवारी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. ट्रकमधून सुमारे ४० गायींची सुटका करण्यात आली. या गायी तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येत होत्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बल्लारपूर पोलीस व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक गोरक्षक कार्यकर्ता कैलास जोरा, सत्यनारायण खेंगर, राज निषाद, अमित चक्रवर्ती, प्रशांत दारला, विकी मांढरे, विशांत ठाकूर, शशांक ठाकूर, जय ठाकूर, संदीप ठाकूर आदींच्या सहकार्याने करण्यात आली.

190821\1757-img-20210819-wa0032.jpg

गो तस्करांच्या तावडीतून ४० गायींची गोरक्षकांनी केली सुटका