शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ३५ लाखांची दारू तर २१ लाखांचे साहित्य जप्त

By admin | Updated: May 4, 2015 01:16 IST

राज्य शासनाने घेतलेल्या दारूबंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.

चंद्रपूर : राज्य शासनाने घेतलेल्या दारूबंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने एप्रिल महिन्यात अवैध दारूविक्री व पुरवठा होत असलेली तब्बल ३५ लाख रूपयांची दारू पकडली तर या कारवाईत २१ लाखांचा साहित्यही जप्त करण्यात आला. दारूबंदी होऊन एक महिन्याचा कालवधी उलटला असून या एक महिन्यात ४२० प्रकरणात तब्बल ५३६ आरोपींना अटक झाली आहे.सामाजिक संघटनांच्या सततच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलापासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. अंमलबजावणी सुरू होताच जिल्हा पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी जिल्हाभरात पथक तयार केले. मुख्य मार्गावर, सीमेवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. दारूविक्री सुरू असलेल्या भंडारा, गोंदिया, यवतमाळ या लगतच्या जिल्ह्यातून तर तेलंगाणा या लगतच्या राज्यातून दारूचा पुरवठा होऊ नये, यासाठी सीमेवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे गस्तीवर असलेल्या अनेक पथकांनी अवैधरित्या पुरवठा होणारा दारूसाठा पकडला. तर अनेक गावात धाडसत्र राबवून अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरी छापे मारण्यात आले. त्यामुळे महिनाभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात ४२० प्रकरणात ५२६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३५ लाख ७५ हजार ५०१ रूपयांची दारू तर २१ लाख एक हजार रूपयांचा साहित्य जप्त करण्यात आला. (वार्ताहर)