शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST

जानेफळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. त्याचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...

जानेफळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. त्याचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने आठवडी बाजारही बंद आहेत. परिणामी जानेफळ येथील आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प झाले आहेत आणि बाजारावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जानेफळ येथे दर शनिवारी गुरांचा मोठा बाजार भरत असतो़ येथील आठवडी बाजार जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सर्वदूर प्रसिद्ध आहे. दर आठवड्याला या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. यानिमित्त गुरांच्या बाजारात पाणी विक्री, जनावरांचे साहित्य जसे दोरखंड, मोरकी, कासरे, चारा विक्री व चहाचे हॉटेल आधी सामान्य व्यवसाय चालवून अनेक कुटुंबे आपली उपजीविका भागवीत असतात. याशिवाय येथे मोठा आठवडी बाजार भरत असल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांंव्यतिरिक्त मेहकर, चिखली, अमडापूर, येथून भाजीपाला, शेव चिवडा, मसाला, चहा विक्री इत्यादी व्यवसायांसाठी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे जवळपास ५२ खेड्यांचे केंद्र असलेल्या जानेफळ येथे आठवडी बाजारात आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला व इतर मालाच्या खरेदीसाठी महिला व नागरिकांची मोठी गर्दी असते. या आठवडी बाजारामुळे हातगाडे व हमालीद्वारे अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा चालतो आणि ग्रामपंचायतीलासुद्धा करातून उत्पन्न मिळते. त्यामुळे येथील आठवडी बाजार हा अनेक कुटुंबांचा आधार आहे. मात्र गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाच्या संसर्गामुळे येथील आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्पच झाले आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने या बाजारात मोलमजुरी करून उपजीविका भागविणारे तसेच बाजारात छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना संसाराचा गाडा चालविणे मुश्कील झाले आहे.

घरी राहावे तर पोट भरणे अवघड व कामाच्या शोधात बाहेर जावे तर संचारबंदीमुळे काम मिळत नाहीये अशी अवस्था सामान्यांची झाली आहे.