शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

अशोक इंगळे साखरखेर्डा : पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन ...

अशोक इंगळे

साखरखेर्डा : पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय शेती फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंद्रिय शेती पद्धतीतून जास्त उत्पादन घेता येत नाही, हा समज त्यांनी खोडून काढला आहे. त्यांनी केलेला सेंद्रिय शेतीचा अवलंब इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

साखरखेर्डा परिसरात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, संकरित ज्वारी ही पिके घेतली जातात. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मातेरे झाले. कापसाच्या वाती झाल्या, मूग सडला, अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकरिता कंबर कसली. मागील शासनाच्या काळात या भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाची अनेक कामे झाली. जमिनीत जलसाठा वाढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा या पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. साखरखेर्डा येथील कुवरसिंग मोहने हे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक म्हणून काम पाहतात. जैविक शेती मिशनचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, यासाठी त्यांनी साखरखेर्डा येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. ज्यांना जैविक शेतीचे नियोजन कळले त्यांनी त्या पद्धतीने शेती केली आणि पहिल्याच प्रयोगात यशही मिळाले.

साखरखेर्डा येथील हरीश सुधाकर देशपांडे यांनी आठ एकर शेतात सोयाबीननंतर गहू घेण्यासाठी शेतीची मशागत केली.

येथील हरीश देशपांडे यांनी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून आठ एकरात गव्हाची पेरणी केली. रासायनिक खतांचा एकही मात्रा न वापरता शेणखत, जिवामृत यांचा वापर करून पेरणी केली. गव्हाची वाढही चार फुटांपेक्षा जास्त झाली. ९ नोव्हेंबर रोजी पेरणी केल्यानंतर चार वेळा पाणी, निंदन असा एकरी तीन हजार रुपये खर्च त्यांना आला. बन्सी जातीचा गहू असल्याने आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्याने या गव्हाची मागणी जास्त असते. आज ४० ते ४५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करून पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवितात. आज एकरी १२ क्विंटल उत्पादन घेऊन ४ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाल्याने त्यांना ८ एकरात ४ लाख ३२ हजारांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती मिशनच्या माध्यमातून शेती किती फायद्याची आहे हे लक्षात येते.

सेंद्रिय खत आणि १२ वनस्पतींपासून बनविलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली तर कोणतेही कीटक त्या पिकावर आक्रमण करू शकत नाही. या गव्हाची पोळी आरोग्याला पोषक असते. संपूर्ण नैसर्गिक वातावरण असल्याने जमिनीचा पोतही सुधारतो.

-समाधान वाघ,

कृषी सहायक, साखरखेर्डा.

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मी शेती केली. त्याचा फायदा मला झाला. हीच पद्धत इतर शेतकऱ्यांनी राबविली तर शेतकरी समृद्ध होईल.

-हरीश सुधाकर देशपांडे,

आदर्श शेतकरी, साखरखेर्डा.

फोटो : हरीश सुधाकर देशपांडे यांनी पेरलेला गहू.