शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:32 IST

जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे.

ठळक मुद्देनागपुरातून निघाले मजल दरमजल करीत मजुरांचे जत्थे

ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वितभर पोटासाठी चिल्या पिल्यांसह महानगरात राबराब राबणाऱ्या मजुरांवर कोरोनाने महासंकट आणले आहे. हाताला काम नसल्याने मजूर आपल्या मूळ गावाकडे धाव घेत आहे. परंतु जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. गत दोन दिवसांपासून भंडारामार्गे गेलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी काही सहृदय मंडळी धावून आली.
गावात काम नसल्याने शेकडो मजूर महानगराकडे धाव घेतात. आपल्या कुटुंबासह त्याच ठिकाणी राहून मिळेल ते काम करतात. हजारो मजूर महानगरात राबताना दिसतात. मात्र संकटाच्या काळात या मजुरांसाठी मात्र कुणी धावून येत नाही. याचा प्रत्येक आता कोरोना संसर्गाच्या निमित्ताने येवू पाहत आहे. मध्यप्रदेशातील हजारो मजूर विविध कामाच्या निमित्ताने नागपूरात राहतात. आता कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निश्चय केला. परंतु गावाला जाण्यासाठी ना रेल्वे ना एसटी बस. खासगी वाहनधारकांचीही विनवनी केली त्यांनीही नकार दिला. शेवटी येथे उपाशी मरण्यापेक्षा आपल्या जन्मभूमीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. आपले बिºहाड उचलून ही मंडळी नागपूरहून मजल दरमजल करीत राष्ट्रीय महामागार्ने गावाकडे कूच करीत आहे. गुरूवारी असाच एक ३० ते ३५ मजुरांचा जत्था भंडारामार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाला. काही मजुरांनी नागपुरातून सायकली मिळवून त्याने प्रवास सुरू केला आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करीत ही मंडळी गाव गाठत आहे. भंडारा शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नास्त्याची व्यवस्था केली. तुमसर पोलिसांच्या मदतीने त्यांना भोजन देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भंडारात दाखल झालेल्या काही मजूरांना येथील एका वसतीगृहात मुक्कामी ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
या मजुरांसोबत त्यांची मुले, बायका आहे. डोक्यावर प्रत्येकाच्या संसाराचे ओझे आहे. ते घेवून ही मंडळी पाय दुखेस्तोवर चालत आहे. कधी एकदा गावात पोहोचतो, अशी त्यांची अवस्था आहे. प्रचंड हाल सोसत ही मंडळी कोरोनाच्या भीतीने गावाकडे निघाली आहे.

विद्यार्थ्यांचेही हाल
नागपूरसह महानगरात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने ही मंडळी तेथेच अडकून पडली आहे. मेस बंद, घराबाहेर काढण्यासाठी घरमालकाचा तगादा, अशा समस्या झेलत आहेत. त्यातील काही विद्यार्थी तर चक्क पदयात्रा करत आपल्या गावाकडे निघाल्याचे दिसत आहे. नागपूरवरून गोंदिया जिल्ह्यातील काही विद्यार्थी शनिवारी सकाळी भंडारा शहरातून मार्गक्रमण करीत होते. रस्ते माहीत नसल्याने रस्त्यावर भेटणाऱ्यांना माहिती विचारत होते. अशा विद्यार्थ्यांचीही भोजनाची व्यवस्था काही दानशूर मंडळींनी करून त्यांना मार्गस्थ केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस