शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रानटी डुकरांच्या उपद्रवाने शेत पिकाचे सुमार नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

शेतकरी हतबल पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी ...

शेतकरी हतबल

पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी आता आपला मोर्चा गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर वळवलेला आहे. डोळ्यादेखत होत असलेले नुकसान शेतकऱ्यांना हतबल करीत आहे.

पालांदूर परिसरात नदी-नाले व झुडपी जंगलांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. रानटी डुकरांच्या नैसर्गिक अधिवासासाठी हे ठिकाण खूप मोठे वरदान ठरले आहे. दिवसाला या ठिकाणी विश्रांती घेऊन रात्रीला सैन्यासारखे पिकावर तुटून पडतात. रात्रीच्या अंधारात बेधुंद होत पिकांची सुमार नुकसान करतात. शेतकऱ्यांना यांचा बंदोबस्त करताना कायद्याच्या आडकाठी तयार झाल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात हल्ली धान पिकाव्यतिरिक्त इतर दुसरे पीक दुर्लभ आहे. त्यामुळे रानटी डुक्कर उन्हाच्या झळा सहन करण्याच्या अनुषंगाने धानाच्या चिखलात स्वताला लोटून घेतात. त्यामुळे गर्भावस्थेत असलेले पीक जमीनदोस्त होत आहेत. काही ठिकाणी धान पिकाला कात्री प्रमाणे कापलेही आहेत. रात्रीच्या अंधारात शेतावर पंप सुरू करायला जावेच लागते. तेव्हा हे सगळे चित्र डोळ्यासमोर येऊनही शेतकरी भीतिपोटी काही करू शकत नाही. वनविभागाने पुढाकार घेत, यातून शेतकरी वर्गाला काहीतरी मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.

चुलबंद खोरा सदाबहार आहे.

नदी-नाल्यांचा आसरा असल्याने वर्षभर रानटी डुकरांचा या परिसरात हक्काचा मुक्काम आहे. खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात रानडुकरांचा उपद्रव शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. रानटी डुकरांचे जत्थेच्या जत्थे रात्रीच्या अंधारात बघायला मिळतात. त्यांचा बंदोबस्त करणे कठीण नाही, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये हात बांधले असल्याने शेतकरी राजा निरुपाय ठरला आहे.

सुमारे पाच एकर शेतात हरबऱ्याचे पीक जोमात आले होते. फळधारणा होईपर्यंत अपेक्षित डुकरांचा त्रास नव्हता. मात्र, हरबऱ्याने घेंगरे पकडल्यानंतर रानटी डुक्कर यांचा उपद्रव असह्य ठरला. सुमारे चाळीस पोती अपेक्षित असणारा हरभरा केवळ १४ पोती एवढाच झाला. आता धान पिकाचेही नुकसान करीत आहेत. वनविभागाकडे मागणी करूनही अत्यल्प मिळत असल्याने व कागदोपत्री समस्या मोठी असल्याने दाद मागितली नाही.

- प्रभाकर कडूकार,

नुकसानग्रस्त (बारमाही) शेतकरी पालांदूर.