शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: May 25, 2017 00:16 IST

तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.

८३ क्युबिक पाणी सोडले : वाघमारे यांच्या प्रयत्नाला यशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालून पाणी विसर्ग करण्याकरिता बाध्य केले.तुमसर तालुक्यात यावर्षी भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडीतथा वैनगंगेचे नदीपात्र कोरडे पडले आहे. मार्च महिन्यातच पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. तत्पूर्वी धान पिकाकरिता सुमारे एक महिन्यापूर्वी बावनथडी धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग केले होते. सध्या वैनगंगा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. शहरासह व तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करणे एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आ.चरण वाघमारे यांच्यासमोर समस्या मांडली.तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणी पुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी मुंबईत आ.चरण वाघमारे यांची भेट घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. शहरात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून बावनथडीचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. हीच स्थिती तालुक्याची आहे.आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे जलसचिव तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीटंचाईची सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचेशी चर्चा करून बावनथडी धरणाचे पाणी विसर्ग करण्यास होकार दिला. बुधवारी सकाळी १० वाजता दुपारी ३ वाजता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह दीपात्रात विसर्ग करण्यात आला. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गेडाम यांनी पाणी विसर्ग करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.