शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

वैनगंगा, बावनथडीचे पात्र रेती तस्करांनी पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते.

ठळक मुद्देपर्यावरणाला धोका । नदीचे सौंदर्य नष्ट, महसूलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचे वैभव असलेली वैनगंगा आणि बावनथडीसह विविध नद्यांचे पात्र रेती तस्करांनी पोखरले असून या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. अहोरात्र रेतीचा प्रचंड उपसा नदीपात्रात होत असल्याने पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या समोरून रेतीची खुली तस्करी होत असताना कोणतीही कारवाई होत नाही. रेती तस्करी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरत असून महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते. पाच वर्षापूर्वीचे नदीपात्र आणि सद्यस्थितीतील नदीपात्राची अवस्था बघितली तर संपूर्ण पात्र पोखरल्याचे दिसून येते. यामुळे नदीचे सौंदर्य नष्ट झाले आहे. अशीच अवस्था बावनथडी नदीचीही झाली आहे.तुमसर तालुक्यातील अकराही रेतीघाटावर सध्या तस्करांचा धुमाकुळ सुरु आहे. उत्खननासाठी येथे स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. दिवसाढवळ्या रेतीच्या ट्रकची वाहतूक होत आहे. यासर्व प्रकाराने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. नदीच्या तळापर्यंत अर्थात माती दिसेपर्यंत उत्खनन केले जाते. त्यामुळे नदीचे भूमीगत प्रवाह बाधीत होण्याची शक्यता आहे. पर्यावरणीय समतोल ढासळत चालल्याने जलचरांनाही धोका संभवत आहे.नदीचे सौंदर्य आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यांना रेतीतरकरांएवढेच प्रशासनही जबाबदार आहे. खुलेआम रेतीतस्करी होत असताना कुणीही त्यात कारवाईसाठी पुढे येत नाही.उलट वेळेवर रसद पोहचली नाही तर मात्र कारवाईचा सोपस्कार पाडला जातो. या व्यवसायात अनेकांची भागीदारी आहे. त्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आहे. रेतीतस्करीचा पर्दाफाश केल्यास अनेकजण उघडे पडण्याची शक्यता आहे आणि हेच होऊ न देण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक रेती घाटावर होणारी तस्करीने आता पर्यावरणाचा प्रश्न निर्माण करीत आहे.वरात इतर घाटांवर का नाहीजिल्हा पोलीस दलाने महसूल विभागाच्या मदतीने वरात काढून पवनी तालुक्याच्या खातखेडा घाटावर गुरुवारी रात्री धाड मारली. मोठी कारवाई केल्याचा डांगोरा पिटण्यात आला. मात्र या धाडीमागील अर्थकारणही पुढे येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांवर तस्करी सुरु असताना खातखेडा घाटच का निवडला हाही संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील इतर घाटांवर वरात काढण्याची कल्पना का आली नसावी. तुमसर तालुक्यातील बाम्हणी घाटावर शेकडो वाहनांचा डेरा आहे. मात्र त्या ठिकाणी धाड टाकण्याचे साधे सौजन्य कुणी घेत नाही. यातच सर्व काही दडले आहे. नागपूर आणि मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धारू रेतीची तस्करी करतात. हे उघड गुपित आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा तस्कारांच्या दावणीला बांधली आहे.

टॅग्स :riverनदीsandवाळू