शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

सहापदरी बायपाससाठी वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 5:00 AM

आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. निलज-कारधा या महामार्गासाठी रस्त्यावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो वृक्षांची कत्तल झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी दीर्घ प्रयत्नानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याला मंजुरी मिळाली. सहा पदरी बायपाससाठी आता शिंगोरी ते मुजबी या दरम्यानच्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यापूर्वीही निलज - कारधा आणि तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्ष तोडण्यात आले. परंतु अद्याप तरी तेथे वृक्षारोपण झाले नाही. अशीच अवस्था या बायपासचीही होणार आहे.राष्ट्रीय महामार्गाचा हा बायपास १४.८० किलोमीटर लांबीचा असून ४२१ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी या बायपासच्या कामाचे उद्घाटन होऊन कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. निलज-कारधा या महामार्गासाठी रस्त्यावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो वृक्षांची कत्तल झाली. पर्यावरणवाद्यांनी आवाज उठविल्यावर वृक्ष लागवड केली जाईल असे सांगण्यात आले. परंतु तेथे अद्यापपर्यंत वृक्षांची लागवड झाली नाही. अशीच अवस्था या बायपासची होईल आणि हिरवीगार वनराई नष्ट होऊन हा परिसर उजाड होण्याची शक्यता आहे.

गावकऱ्यांनी जोपासली मुलाप्रमाणे झाडे- भंडारालगतच्या भिलेवाडा परिसरात वेगाने बायपासचे काम सुरू आहे. यासाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे. नागरिकांनी आपल्या मुलाप्रमाणे या वृक्षांना वाढविले. परंतु आता आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या डोळ्यासमोर कत्तल होत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गenvironmentपर्यावरण