शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी ; सरकारने आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारप्रमाणे आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक ०२ के भंडारा : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष ...

२६ लोक ०२ के

भंडारा : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष मिळूनही यावर मार्ग काढू शकले नाही. मात्र, आतातरी महाविकास आघाडी सरकारने आंध्रप्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी मदत करावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.

ओबीसी आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तत्काळ निर्णय घ्यावा कारण इम्पेरिकल डेटा उपलब्ध झाला नाही. आणि लगेच राज्यात पाच जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या. महत्त्वाची बाब म्हणजे जर आंध्रप्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढला तर, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवून ठेवता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पाच जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जाहीर केल्या. तत्काळ महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावून ओबीसी आरक्षणासाठी आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने डेटा दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ४ मार्च २०२१ च्या निकालाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले.

राज्य सरकारने न्यायालयात वेळेतच इम्पेरिकल डेटा सादर केला असता तर, ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहिले असते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व अति महत्त्वाकांक्षामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. ज्याप्रमाणे राज्य सरकार दोषी आहे. त्याचप्रमाणे त्यापेक्षा सर्वात मोठा दोष केंद्र सरकारचा आहे, असेही ओबीसी क्रांती मोर्चाने म्हटले आहे.