शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

पारा ११ अंशाखाली; कडाक्याच्या थंडीने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

करडी(पालोरा):- कोका वन्यजीव अभयारण्य व न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्पा जवळील करडीपरिसरात हुडहुडी भरविणारया थंडीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळपासून शेकोट्या ...

करडी(पालोरा):- कोका वन्यजीव अभयारण्य व न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्पा जवळील करडीपरिसरात हुडहुडी भरविणारया थंडीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळपासून शेकोट्या पेटविण्याच्या संख्येत वाढ झाली असून पहाटे फिरणे बंद झाले आहे. दिवसाचे व रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली असून पाश ११ अंश सेल्सीअसपर्यंत खाली घसरला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाहणारी हवेची झुळूक सुद्धा बोचरी वाटू लागते आहे. मात्र, रब्बी पिकांच्या वाढीसाठी थंडीचा फायदाच होण्याचा अंदाज शेतकऱ्यांत आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून लहरी हवामानाने करडी परिसरवासियांना छळले आहे. जुलै अखेरीस सुरू झालेला पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाडयापर्यंत सतत कोसळत राहीला. परिसरात वैनगंगा नदी व नाल्यांना दोनदा महापूर आले. पावसाने सरासरी गाठली. नदी-नाले दुथडी भरून वाहीले. तलाव, बोडया व कृषी बंधारे तुडूंब भरली. दिवाळीनंतरही पावसाने पिच्छा सोडला नाही. आठवडाभर पावसाने थैमान घातल्याने हलके धान संकटात सापडले. हल्के व भारी धान फुलोऱ्यावर असतांना मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हदयाचा थरकाप उडत होता. केव्हा पाऊस जातो, याचीच चिंता सगळीकडे होती. शेतकरी तर पूस्ता वैतागला होता. परिणामी धानाचा उतारा ३० टक्के आला.

आता तर दिवसाही थंडी वाटू लागत असून सायंकाळपासून ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. शेकोटी भोवती सवंगडी गोळा होत गप्पागोष्टींना सुरूवात झाली आहे. परंतू गार करणाऱ्या थंडीचा फटका वृद्ध नागरिकांना बसतांना दिसत असून सर्दी, खोकला आदी आजार वाढीस लागले आहेत. थंडीने वृद्धांच्या मरणाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हुडहुडी आणखी वाढून तापमानात घट होण्याचा अंदाज नागरिकांत व्यक्त होत आहे.

पहाटेला धुक्यांची चादर

पाऊस निघताच जोरदार थंडी पडण्याचा अंदाज खरा ठरतांना दिसत आहे. रात्रीला किमान ११ अंश सेल्सीअश पर्यंत तापमानात घट झालेली पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात सायंकाळपासूनच धुक्यांची चादर कवेत समावून घेत आहे. पहाटे फिरणारे अबाल वृद्धांनी वाढलेल्या थंडीमुळे बाहेर पडणे बंद केले आहे.

बॉक्स

ढगाळ वातावरणाचा फटका

थंडीत वाढ झालेली असतांनाच ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दाट धुके व ढगाळ वातावरणाने फुलोऱ्यावरील तूरीच्या पिकावर अळयांचा प्रकोप वाढीस लागला आहे. वागे, टमाटर आदींवर किडीने पोखरण्यास प्रारंभ केला आहे. उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांवरही पांढरे ठिपके पडलेले दिसून येत आहेत.