शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 5:00 AM

महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे.  जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : असह्य उन्हाळा सुरू आहे. भूजल पातळी खालावलेली आहे. धानाचा शेतकरी संकटात आहे. अशा संकटकाळात बागायती, भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. गत वर्षभरापासून भाजीपाल्याला अच्छे दिन! दिसत आहेत. वांग्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपयाचा दर मिळत आहे. एकरामागे शेतकऱ्याला लक्ष रुपयांचा नफा अपेक्षित मिळत आहे.महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे. जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. उर्वरित क्षेत्रात इतर शेत पिके घेतले जातात. मात्र यात जोखीम व खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित नफा पडताना दिसत नाही. भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरी मात्र समाधानी असून दररोज नगदी आवक कुटुंबाचा उत्साह वाढविणारा ठरत आहे. जमिनीत सर्वच भाजीपाल्याची व बागायती ची पिके घेतले जातात. नगदी पिके समजले जाणारे उत्पन्न निश्चितच शेतकऱ्यांना समाधान देणारी ठरत आहेत. जिल्ह्यातील बागायतदार व भाजीपाला कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरानंतर समाधान व्यक्त होत आहे.

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करावा. गत वर्षभराचा अभ्यास केल्यास प्रत्येकच भाजीपाल्यातील भाज्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले आहेत. कमी पाण्याची शेती स्वीकारा. भाजीपाल्यासाठी २४ तास बीटीबी सब्जी मंडी सेवेत आहे.  -बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा. धानापेक्षा तरी भाजीपाल्याची शेती परवडणारी आहे. केवळ ४५ दिवसात घरात नगदी आवक सुरू होते. तंत्रशुद्ध नियोजन केल्यास लक्ष रुपये एकराला नफा मिळण्यास अडचण नाही.-दुर्गेश कांबळे, कारले उत्पादक,  खोलमारा मिरची पिकाला योग्य नियोजनाअंती सहजतेने लक्ष रुपये उरतात. एक मिरचीचा तोळा ६० ते ८० हजार रुपयांपर्यंत गेला. कमी पाण्यात अधिक उत्पन्नासाठी भाजीपाल्याची शेती निश्चितच फायद्याची आहे.-अरुण पडोळे, मिरची उत्पादक पालांदूर. माझ्याकडे फळबाग आहे. कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन होतो. एका एकराला लक्ष रुपयापेक्षा अधिक नफा मिळतो.-पराग शांतलवार, शेतकरी  माडगी.  

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या