शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM

एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देकारखाना व्यवस्थापनाची शिष्टाई : शिवसेनेच्या आंदोलनाचे यश, सुरक्षा रक्षकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथे मानस साखर कारखाना असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक यांचे गत सहा महिन्यापासून पगार झाले नाही. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांपुढे जगण्याचे मोठे आव्हान असताना कामाचा दाम मिळत नसल्याने ११ ऑगस्ट रोजी मानस साखर कारखाना देव्हाडा येथे शिवसेना मोहाडी तालुका शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांच्या नेतृत्वाखाली व सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.अखेर मानस साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांच्या मध्यस्थीने तोडगा काढून पगार देण्यास येईल, असे सांगून मध्यस्थी करण्यात आली व संबंधित एजंसीच्या वतीने पगार वाटप करण्यात आले.कंपनीने जर पगार दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षक हे कंपनीचे नसून एजन्सीचे आहेत.एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.सुरक्षा रक्षकाकडून साखर कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करीत होते ते खोटे आहे. कारण सुरक्षा रक्षकाची भरती एजेन्सीकडून केले जाते. त्यांना कारखानाकडून बंद केले जात नाही. त्याची जबाबदारी एजेन्सीवर असते. परंतु सुरक्षा रक्षक आम्हाला धारेवर धरतात. सुरक्षा रक्षकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.-विजय राऊत, व्यवस्थापक, मानस साखर कारखाना, देव्हाडा.व्यवस्थापनाकडून तोडगाभंडारा जिल्ह्यात एकमात्र साखर कारखाना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे असून या ठिकाणी ४० सुरक्षा रक्षक कामावर आहेत. गत सहा महिन्यांपासून १२ सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा पैसा मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने तोडगा काढला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना