शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
3
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
4
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
5
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
6
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
7
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
8
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
9
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
10
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
11
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
12
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
13
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
14
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
15
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
16
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
18
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
19
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
20
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देकारखाना व्यवस्थापनाची शिष्टाई : शिवसेनेच्या आंदोलनाचे यश, सुरक्षा रक्षकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथे मानस साखर कारखाना असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक यांचे गत सहा महिन्यापासून पगार झाले नाही. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांपुढे जगण्याचे मोठे आव्हान असताना कामाचा दाम मिळत नसल्याने ११ ऑगस्ट रोजी मानस साखर कारखाना देव्हाडा येथे शिवसेना मोहाडी तालुका शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांच्या नेतृत्वाखाली व सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.
अखेर मानस साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांच्या मध्यस्थीने तोडगा काढून पगार देण्यास येईल, असे सांगून मध्यस्थी करण्यात आली व संबंधित एजंसीच्या वतीने पगार वाटप करण्यात आले.
कंपनीने जर पगार दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षक हे कंपनीचे नसून एजन्सीचे आहेत.
एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

सुरक्षा रक्षकाकडून साखर कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करीत होते ते खोटे आहे. कारण सुरक्षा रक्षकाची भरती एजेन्सीकडून केले जाते. त्यांना कारखानाकडून बंद केले जात नाही. त्याची जबाबदारी एजेन्सीवर असते. परंतु सुरक्षा रक्षक आम्हाला धारेवर धरतात. सुरक्षा रक्षकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
-विजय राऊत, व्यवस्थापक, मानस साखर कारखाना, देव्हाडा.

व्यवस्थापनाकडून तोडगा
भंडारा जिल्ह्यात एकमात्र साखर कारखाना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे असून या ठिकाणी ४० सुरक्षा रक्षक कामावर आहेत. गत सहा महिन्यांपासून १२ सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा पैसा मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने तोडगा काढला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना